Devendra fadnavis & Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis On Jarange : जरांगेंनी उपोषण सोडताच सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काम करणार नाही'

CM Fadnavis first reaction : सरकारच्या या जीआरनंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. राज्य सरकारने नेमलेल्या उपसमितीने मध्यस्थी करीत हैदराबाद गॅझेट लागू कण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारने तसा जीआर काढला. सरकारच्या या जीआरनंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाबाबत संविधानात्मक तोडगा काढता आला त्याचे समाधान वाटते. त्यासोबतच दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे काम कधीच करणार नाही, असेही त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

राज्य सरकारकडून या शिष्टाईचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहे. मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांचे उपोषण आता संपलेले आहे. खरे म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनच तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे, या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते. सरसकट कुणबी प्रमाणत्र देण्यास कायदेशीर अडचणी होत्या, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

राज्यातील सर्वच समाजाचे समाधान कसे होईल, हेच माझे लक्ष्य होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीला हवे ते अधिकार दिले होते. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishn Vikhe patil) यांच्यासह त्यांच्या समितीचे त्यांनी कौतुक केले.

मराठवाड्यात राहणारे मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत नव्हता. मात्र, आता त्यांना नियमांनी सर्टिफिकेट देता येणार आहे. पुरावा दिल्यानंतर लगेचच त्यांना आरक्षण मिळणार आहे. ज्यांचा क्लेम आहे, अशा नागरिकांना कागदपत्राअभावी आरक्षण मिळत नव्हते. मात्र, आता गॅझेटमुळे त्यांचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरक्षणाबाबत संविधानात्मक तोडगा काढता आला त्याचे समाधान आहे. काम करीत असताना टीका सहन करावी लागते. त्यामुळे विचलित झालो नाही. उलट काम करीत राहिलो. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. येत्या काळात सर्वच समाजाकरिता काम करीत राहणार असून कर्तव्य करताना शिव्या मिळतात तर चांगले काम केले तर सत्कारही होतो, असे फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT