Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

BJP News : मोठी बातमी: फडणवीस आपला शब्द पाळणार, विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भाजपनं 'ही' तीन नावं केली फायनल..?

MLC Election 2025 : विधान परिषदेची निवडणूक येत्या 27 मार्चला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांनी 10 मार्चपासून अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात भाजपच्या वाट्याला 3,राष्ट्रवादी काँग्रेस 1, आणि एकनाथ शिंदे शिवसेना 1 अशा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये मोजक्याच जागांसाठी इच्छुकांची संख्या मात्र प्रचंड असल्याचे दिसून येत आहे.यामुळे महायुतीतील तीनही प्रमुख नेत्यांसाठी पाच नावं निश्चित करणं हे महाकठीण काम असणार आहे. यातच आता भाजपच्या (BJP) गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं आता विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आपली नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही तीन नावं दिल्लीत फायनल करण्यात आल्याचेही बोलले जात आहेत. महाराष्ट्र भाजपकडून दादाराव केचे,अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी ज्येष्ठ व एकनिष्ठ नेत्यांना आमदारकीची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेची निवडणूक (MLC) येत्या 27 मार्चला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांनी 10 मार्चपासून अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांमध्ये इच्छुकांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत मोठी फिल्डिंग लावली आहे.

महायुतीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड,शिवसेनेचे आमशा पाडवी आणि अजित पवारांच्या पक्षाकडून राजेश विटेकर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.त्यामुळे त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या रिक्त जागांसाठी भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक, शितल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांची नाव आघाडीवर असून त्यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार झिशान सिद्दकी, संग्राम कोते-पाटील आणि माजी खासदार आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत.या तीन जणापैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 10 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 17 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून 18 मार्चला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 20 मार्च आहे. 27 मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT