Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray question to BJP: कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल

Farmers loan waiver issue News : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार आपल्याच धुंदीत आहे. डोळ्यादेखत उगवलेले पीक मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला एकत्र येण्याची विनंती केली होती.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार आपल्याच धुंदीत आहे. डोळ्यादेखत उगवलेले पीक मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला एकत्र येण्याची विनंती केली होती. मात्र, राज्य सरकारकडून मदत केली जात नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. राज्यावर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. चार दिवसापूर्वी या भागाची पाहणी केली. त्याचवेळी या संकाटातुन मार्ग काढण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या काही दिवसापासून फक्त पंचनामे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत होत नसल्याबद्दल त्यांनी धारेवर धरले.

अतिवृष्टीचे संकट कोसळले असताना मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री मदतीवर स्वतःचे फोटो लावण्यात व्यस्त आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री काहीच अंगाला लावून घेत नाहीत, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्ज माफ करणार आहेत का?

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पीक उद्ध्वस्त झालं आहे. रोज शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या येत आहेत. साखर सम्राट भाजपमध्ये (BJP) गेल्यास त्याच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल तर साध्या शेतकऱ्यांनी भाजपमध्ये येण्याची वाट भाजप पाहत आहेत का? शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्ज माफ करणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक अतिवृष्टीत वाहून गेले आहे. काही लोकांच्या घरातील संसाराचे सामान वाहून गेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पिके तर पूर्णपणे हातातून गेली आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT