<div class="paragraphs"><p>Bhagatsingh Koshyari - CM Uddhav Thackeray&nbsp;</p><p>Governor vs Government</p></div>

Bhagatsingh Koshyari - CM Uddhav Thackeray 

Governor vs Government

 
Sarkarnama
महाराष्ट्र

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार; 'मविआ'चे बडे नेते मनधरणीसाठी राजभवनावर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी सरकारकडून आलेल्या १२ आमदारांच्या नावाला अद्याप मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध सरकार (Governor vs Government) असा संघर्ष मागच्या काही दिवसांपासून सुरुच आहे. पण आता राज्यपालांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या अजून एका प्रस्तावाला मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध-ठाकरे सरकार अशी पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. याच मुद्दांवर आता राज्यपालांची मनधरणी करुन त्यांनी परवानगी द्यावी यासाठी महाविकास आघाडीचे तीन बडे नेते राजभवनावर जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेत सध्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Assembly President Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी अर्ज भरायचे आहेत. मात्र सध्या राज्यपालांनी अजूनही या निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल दिलेला नसल्याने हा निवडणूक कार्यक्रम केवळ कागदोपत्री राहणार का? असा सवाल विचारला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने २३ डिसेंबर रोजी राज्यपालांना या निवडणुकीबाबत कळविले आहे, पण त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतरच सभागृहाच्या दैनंदिन कामकाजात या निवडणूक कार्यक्रमाचा समावेश होणार आहे.

परिणामी राज्यपालांकडून या निर्णयाला ग्रीन सिग्नल आणण्याची जबाबदारी तीन बड्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. शिवसेना विधिमंडळ गट नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), काँग्रेस विधिमंडळ गटनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर जाणार आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता ही भेट होणार आहे. या भेटीत ते विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक संदर्भात राज्यपालांशी चर्चा करुन त्यांची मनधरणी करणार आहेत.

बंडखोरीचीही तयारी

राज्यपालांनी हा निर्णय अडवल्यानंतर या विरोधात महाविकास आघाडीने स्पष्टपणे बंडखोरी करणार असल्याचे काल जाहीर केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबात स्पष्ट करताना म्हटले की, दिल्लीवरून अध्यक्षपदाचे नाव अद्याप अंतिम झालेले नाही. राज्यपालांना या निवडणुकीबाबत कळवले आहे, पण त्यांच्याकडून अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही. पण त्यांनी मंजूरी दिली नाही तरी निवडणूक होणार आहे. त्यांना केवळ कळवायचे होते, तर त्याबाबतचे पत्र मंत्रिमंडळाने माहितीस्तव पाठवले आहे. सोमवारी ही निवडणूक होणार आहे. हायकमांड यावर लक्ष ठेवून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT