Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
महाराष्ट्र

नारायण राणेंची सुरक्षा वाढवली : कोकणातील अटकेनंतर धोका वाढला

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राणेंच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यानुसार राणे यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा होती. यानुसार आता सीआयएसएफच्या ८ कमांडोंचे कवच राणेंच्या सुरक्षेत असणार आहेत, आधी केवळ २ कमांडो होते. तसेच सुमारे ३४ सशस्त्र पोलिस २४ तास पहारा देणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. नाशिकमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली होती. राणेंना महाड न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना जामिन मंजूर केला होता.

मात्र या दरम्यान युवासेनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. अनेक ठिकाणी नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते तर मुंबईतील त्यांच्या बंगल्यासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी निदर्शन केली होती. याच सगळ्या प्रकारानंतर राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला होता. नुकताच हा अहवाल गृहमंत्रालयाला प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार राणेंना वाढलेला धोका लक्षात घेवून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता सीआयएसएफचे ८ कमांडोचे कवच राणे यांना सुरक्षा देणार आहे. आता शनिवारपासून राणेंचे सुरक्षा कवच 'Z' श्रेणीचे होणार आहे. त्याबाबतचे आदेश केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलास (CISF) देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT