Ashish Shelar
Ashish Shelar  

sarkarnama

महाराष्ट्र

करण जोहरच्या पार्टीतील ठाकरे सरकारमधील 'ते' मंत्री कोण?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता, निर्माता करण जोहरने (Karan Johar) आयोजीत केलेल्या पार्टीत दोन अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाली होती. या पार्टीवर भाजपने अनेक आरोप केले आहेत. करण जोहरच्या या पार्टीत महाविकास आघाडी सरकारमधील एक मंत्री सहभागी होता, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी केला आहे. शेलार माध्यमांशी बोलत होते. या पार्टीत अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाली आहे.

"करण जोहर याच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीतील सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाला अशा बातम्या वाचल्या. करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक होते? त्या सर्वांची टेस्ट झाली का? असे प्रश्न मी पालिकेला विचारले या पार्टीत किती लोक होते यावरून संशय निर्माण होत आहे." असे मत शेलार यांनी व्यक्त केले आहे.

"मी पालिकेला विचारले की, तुम्ही रिजेसी नामक इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे का ? त्यावेळी पालिकेकडून नाही, असे उत्तर आले. त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होते का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्यांनी पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होते का त्याची स्पष्टता असावी," असे शेलार म्हणाले. उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शेलारांना प्रतिउत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ''दोन वर्षे असे आरोप ऐकतोय. मागील वेळीही असंच झाले होते. त्यातून काय निष्पन्न झाले का?''

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेल्या भूमिकाला सुप्रीम कोर्टाने एकामागोमाग एक धक्के दिले आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने आधी राज्य सरकारने केंद्राकडे केलेली इम्पिरिकल डेटाची मागणी फेटाळली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश रद्द केला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेलार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ''ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने खून केला आहे. तो खून हेकेखोरीमुळे केला आहे. अहंकार आणि सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यावर काय होतं तसा हा हेकेखोरपणा आहे. राज्य सरकार म्हणाले की डाटा आम्हाला केंद्राने द्यावा. लोकांची फसगत करायची हे पाप यांचे आहे. सरकारचा हा नाकर्तेपणा आहे. दुसऱ्यावर आरोप करून त्यांना हे अपयश झाकता येणार नाही,''

''हे पाप नवाब मलिक यांच्या सरकारने केले आहे. हे सरकार दृष्टीहीन आणि बुद्धीहीन, दिशाहीन आहे. ओबीसी समाजाचे मारेकरी या सरकारमध्ये बसले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकण्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहोत. इच्छाशक्ती असेल तर कामाला लागला आम्ही तुम्हाला मदत करू,'' असे शेलार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT