Vasai-Virar Municipal Corporation
Vasai-Virar Municipal Corporation Sarkarnama
कोकण

आरक्षणाचे रणकंद पुन्हा सुरु होणार; केळकरांच्या मागणीला पटोले अन् ठाकूरांचा पाठिंबा

संदीप पंडीत

विरार : राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण रंगले आहे. त्याच प्रमाणे याच मुद्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. महानगरपालिकेच्या निवडणुका होत असून त्यासाठी मागास्वर्गीयांच्या जागा आरक्षित असून, सद्या हा कोटा 35 टक्के आहे. तो कोटा पूर्ण पणे 50 टक्के देऊन मागासवर्गीयांना दिलासा द्यावा अशी, मागणी निवृत्त पालिका आयुक्त कल्याण केळकर यांनी निवडणूक आयोग, प्रधानसचिव नगरविकास आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. केळकर यांच्या या मागणीला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी पाठिंबा दिला आहे.

राज्यात सद्या महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या साठी निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागा निश्चित केल्या आहेत. त्याच प्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत नगरविकास विभागाकडून 1 ऑक्टोबर 2021 रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशात सुधारणा करण्यात आली आहे. त्यात निवडणुकीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या निवडणुकीने भरावयाच्या जागा ह्या 27 टक्के असून तसेच पालिकेतील एकूण आरक्षित जागा या 50 टक्क्यापेक्षा जास नसाव्यात अशी तरतूद केली आहे. यावर बोट ठेवताना केळकर यांनी आताच्या वसई विरार पालिकेची राखीव ठेवण्यात आलेल्या जाग ह्या 35 टक्के आहेत. यात वाढ करून त्या 50 टक्के कराव्यात, अशी मागणी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

या संदर्भात त्यांनी पाठवलेल्या पत्रात आकडेवारी दिली आहे. सद्या वसई विरार महापालिकेत 115 नगरसेवक आहेत. निवडणुकीसाठी अनुसूचित जाती 5, अनुसूचित जमाती 5 ,आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 31 टक्के आरक्षण आहे. म्हणजेच 35. 68 इतकी टक्केवारी होते. हि टक्केवारी 50 टक्केपेक्षा कमी आहे. या मध्ये 50 टक्के प्रमाणे 57 जागा होतात. म्हणजेच 16 जागा शिल्लक आहेत. तर राज्य सरकारने नगरसेवकांच्या जागांमध्ये 17 टक्के वाढ केल्याने वसई विरार मध्ये आता 126 नगरसेवक होणार आहेत. त्यामुळे नव्याने 18 जागा शिल्लक राहत आहेत. ह्या जागा भरल्यावरही मागासवर्गीयांचे आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा खालीच राहणार आहे. निवडणूक आयोग आणि राज्य शासनाने निवडणुकीसाठी मागास प्रवर्गासाठी जागा वाढवाव्यात, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.

केळकर यांनी केलेल्या मागणीला ठाकूर आणि पाटोले यांनी पाटींबा दिला आहे. याबाबत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांना याबाबत पत्रे पाठवली आहेत. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून यात लक्ष घालून निवडणुकीपूर्वी हा बदल करून नागरिकांच्या मागासप्रवर्गामध्ये 50 टक्के आरक्षण करण्याचे ककार्यवाही करावी, अशी मागणी केल्याने पुन्हा एकदा ओबीसींच्या आरक्षणावरून रणकंदन सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT