आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईंचे निधन झाल्यानंतर त्यांनी पारंपरिक अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला
त्यांच्या या निर्णयामुळे समाजात परंपरा आणि आधुनिक विचार यावर चर्चा सुरू झाली आहे
मुंढेंचा हा निर्णय सामाजिक बदल आणि रूढींविरोधातील आदर्श उदाहरण म्हणून पाहिला जात आहे
Beed News : महाराष्ट्रातील धडाकेबाज IAS अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्राला ओळख आहे. दिव्यांग कल्याण विभागात जवळपास दीड वर्षांत कामाचा धडाका लावत दिव्यांगाना त्यांचे हक्क देण्याचे काम केले. तर अनुदान लाटणाऱ्या संस्थां त्याच्या निशाण्यावर होत्या, त्यांच्यावर आता कारवाई होईल अशा चर्चा राज्यात सुरू असतानाच त्यांची बदली करण्यात आली. यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उत आला असतानाच त्यांना मातृशोक झाला.
त्यांच्या आई आसराबाई यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. याबाबत त्यांनीच माहिती दिली होती. तर आता त्यांनी आईच्या अंत्यविधीनंतर मोठा निर्णय घेत आईंच्या अस्थी दहाव्या दिवशी विसर्जीत न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय एक आदर्श उदाहरण मानलं जात असून अंत्यविधी झाल्यावर कसल्याही अनावश्यक प्रथा परंपरा रूढींना बाजूला ठेवणारा असल्याचे बोलले जात आहे.
धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आली. यानंतर ते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर होते. याचदरम्यान त्यांना मातृशोक सहन करावा लागला आहे. त्यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे निधन झाले आहे. तर आईच्या निधनाची बातमी समजताच तुकाराम मुंढे महाराष्ट्राकडे निघाले होते. दरम्यान बीड जिल्ह्यातील त्यांच्या ताडसोना या मूळगावी आसराबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाल्याने प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली. तर कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आसराबाई मुंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी आईच्या निधनानंतर तुकाराम मुंढे भावूक झाले होते. तर बंधूंच्या गळ्यात पडून ते रडतानाही दिसले. मातोश्रींच्या पार्थिवावर अत्यंसस्कार झाल्यानंतर आता त्यांनी सामाजिक जावीण जपणारा निर्णय घेतला आहे.
आईच्या मृत्यूनंतर अंत्यविधी झाल्यावर कसल्याही अनावश्यक प्रथा परंपरा रूढींना प्राध्यान्य न देताना तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आईच्या अस्थींचे विसर्जन केले. 10 दिवसांची वाट न पाहता, नदीतरी न जाता वेगळ्या पद्धतीने त्यांनी आईंच्या अस्थींचे विसर्जन केले. त्यांनी आपल्या आईच्या अस्थींचे विसर्जन हे आपल्या शेतातील घरासमोर केले.
येथे एक खड्डा खोदून त्यात अस्थींचे विसर्जन केले. तसेच त्या खड्ड्यात एक वडाचे रोपटे लावले. तर कर्मकांडांच्या विधींना फाटा देत त्यांनी आपल्या आईंच्या आठवणी जपण्याचे काम केलं आहे. सध्या या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे.
1. तुकाराम मुंढे यांनी कोणता निर्णय घेतला?
आईच्या निधनानंतर त्यांनी दहाव्या दिवशी अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला.
2. हा निर्णय चर्चेत का आहे?
कारण हा निर्णय पारंपरिक रूढींना छेद देणारा असून सामाजिक बदलाचा संदेश देतो.
3. मुंढे कोण आहेत?
ते महाराष्ट्रातील धडाकेबाज आणि कडक प्रशासनासाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी आहेत.
4. समाजात यावर काय प्रतिक्रिया आहे?
काही जण याला आदर्श मानत आहेत, तर काही जण पारंपरिक दृष्टिकोनातून यावर चर्चा करत आहेत.
5. या निर्णयाचा व्यापक परिणाम काय होऊ शकतो?
लोकांमध्ये अंधश्रद्धा आणि अनावश्यक परंपरांबाबत जागरूकता वाढू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.