रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील राजकीय वाद पुन्हा उफाळून आला आहे.
अजित पवारांच्या हस्तक्षेपानंतरही आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर आक्रमक वक्तव्य केले.
या वक्तव्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Raigad News : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात राजकीय वाद दिवसागणित वाढतानाच दिसत आहे. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांची बैठक घेतली होती. तर मंत्री आदिती तटकरे यांना देखील रायगडच्या वादावर पडदा टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. ज्यानंतर गोगावले यांनी आपली तलवार म्यान करत दादांनी दोन पावले पुढे येण्याचा विचार केला असेल तर आम्ही चार पावले पुढे जावू असे म्हणत वादावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे येथील वाद थांबेल असा तर्क लावला जात होता. मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत मी असा बॉम्ब फोडीन की ते पळून जातील असे म्हटले आहे. यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात राजकीय संबंध तुटण्यापर्यंत वाढला आहे. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावलेंसह शिवसेनेचे आमदार यांच्यात सतत ठिणग्या पडताना दिसत आहेत. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्ब फोडत राज्यात खळबळ उडवून दिली. तर या कॅशबॉम्बची वात तटकरे यांनी लावल्याचा दावा आमदार महंद्र थोरवे यांच्यासह आमदार महेंद्र दळवी यांनी केला. यानंतर आता येथे आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली आहे.
दरम्यान अजितदादांनी कानपिचक्या दिल्यानंतर गोगावले आणि आदिती तटकरे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली होती. रायगडमध्ये राज्य परिवहनाच्या नव्या बस गाड्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दोघेही उपस्थित होते. मात्र यानंतरच दळवी यांनी तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुपारी देऊन फोडलेले कॅशबॉम्ब फुसके निघालेत. मात्र मी असा बॉम्ब फोडीन की ते रोहाच काय तर महाराष्ट्र सोडून पळून जातील असं म्हटलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दळवी यांनी, तटकरे यांनी सुपारी देऊन फोडलेले कॅशबॉम्ब फुसके असून त्यांनी तीन बॉम्ब फोडले आहेत. पण मी चौथा बॉम्ब असा फोडने की ते रोहाच काय तर महाराष्ट्र सोडून विदेशात पळून जातील, असा दावा केला आहे.
पण मला संस्कार आहेत, संस्कृती आहे. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यांनी जे काही कॅशबॉम्ब फोडले. तेही सुपारी देवून त्यांनी अशा लोकांना उभं केलं आहे. जे त्यांना अशोभनीय आहे. त्यामुळे आता त्यांची उतरती कळी लागल्याचाही दावा दळवी यांनी यावेळी केला आहे.
तसेच यावेळी दळवी यांनी अजितदादांनी केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली असून दादांचे वक्तव्य हे आमच्यासाठी दिशा दर्शक असून पालकमंत्रीपद आम्हालाच (शिवसेना) मिळेल यात आता शंका नाही तर विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
1. रायगडमधील राजकीय वाद कशामुळे वाढला आहे?
➡️ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील नेत्यांमधील वक्तव्ये व आरोपांमुळे वाद वाढत आहे.
2. अजित पवारांनी या वादात काय भूमिका घेतली होती?
➡️ त्यांनी मंत्री उदय सामंत, भरत गोगावले व आदिती तटकरे यांच्याशी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
3. भरत गोगावले यांनी काय प्रतिक्रिया दिली होती?
➡️ दादांनी दोन पावले पुढे टाकली तर आम्ही चार पावले पुढे जाऊ, असे मवाळ वक्तव्य त्यांनी केले होते.
4. महेंद्र दळवी यांनी कोणावर हल्लाबोल केला आहे?
➡️ त्यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली आहे.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
➡️ रायगड जिल्ह्यातील सत्ताधारी आघाडीतील तणाव वाढून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.