Khalapur Irshalwadi Landslide : Anil Patil Sarkarnama
कोकण

Raigad Khalapur Irshalgad Landslide: मदत-पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणतात, "लष्कर आणि हेलिकॉप्टर रेस्क्यू अॉपरेशन...

सरकारनामा ब्यूरो

Khalapur Incident : पावसाने झोडपून काढल्यामुळे कोकण परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Incident) दरड कोसळली आहे. यात अंदाजे सुमारे शंभर ते दीडशे नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्याशी संपर्क केले असता, त्यांनी घटनास्थळी काही वेळातच पोहचणार असल्याचे सांगितले.

मंत्री पाटील म्हणाले, "काल (दि.१९) रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मला रात्री साडेबारा दरम्यान या घटनेची माहिती मिळाली. जिल्हाधिकारी, तहसीलदार घटनास्थळी रात्रीच पोहचलेले आहेत. एनडीआरएफची टीमसुद्धा त्या ठिकाणी पोहचलेले आहे. रात्री अंधार खूप होता. त्यामुळे मदतकार्य करणं थोडं कठीण गेलं. मात्र आता मदतकार्याला गती आली आहे. मी आता घटनास्थळाकडे रवाना झालो आहे. काही वेळात मी तिथे पोहचेन."

"लष्कराच्या टीमला देखील कळवलं गेलं आहे. हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आवश्यकता असेल तर ते पोहचवण्याची व्यवस्था केली जाईल. सगळ्या गोष्टींचा विचार केला जात आहे. त्या ठिकाणी सर्व मदतकार्य पुरवण्यात येईल. प्रत्येक घटनांचा, परिस्थितीचा आढावा मी घेत आहे," असे मंत्री पाटील म्हणाले.

आतापर्यंत 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मंत्री उदय सामंत, दादा भूसे, याठिकाणी पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.

काल रात्री अंधार व पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून सर्वत्र चिखल झाला आहे. चिखल तुडवून गावापर्यंत बचावकार्यासाठी जावे लागत आहेत. रात्री मदतीसाठी जात असताना अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

सकाळ होताच वेगाने बचावकार्य सुरू झाले आहे. ४० ते ५० कुटुंब येथे राहत होते. अडीशे जण येथे राहत असल्याची माहिती आहे. पंचवीस जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. शंभरहून अधिक जण अद्याप आहेत. या वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT