Lok Sabha Election Result : नारायण राणेंनी विजय मिळवला असला तरी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात राणेंना लीड मिळाले नाही. त्यामुळे उदय सामंत यांनी नारायण राणे यांना लीड का देऊ शकले नाही, याचे कारण सांगवे. सामंत जे वागले ते राणे कधीच विसरणार नाहीत, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला. या इशाराला मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मी प्रामाणिकपणे काम करणारा काम करतो. त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. नीलेश राणे यांनी जे वक्तव्य केले त्याची खात्री करावी. याबाबत त्यांची तक्रार असेल तर त्यांनी ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करावी. फडणवीस योग्य ते बोलतील, असे सामंत Uday Samant यांनी सांगितले.
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली, असा जाहीर आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. फक्त या आरोपांवरच राणे थांबले नाहीत तर या भेटीचे पुरावे आपल्याकडे असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचेही राणे म्हणाले.
नारायण राणेंच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातवर दावा सांगितले आहे. त्याला देखील सामंत यांनी उत्तर दिले. मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार चर्चा करतील. मी महायुतीतला मंत्री आहे. मला वाद वाढवायचा नाही. मी त्यांच्या मताचा आदर करतो, असे सामंत म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.