Mahavikas Aghadi Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election: जागावाटपावरून मविआत धुसफूस, आघाडी कधीही तुटू शकते; भाजप नेत्याचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीत (MVA) जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावरून आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे, तर सांगली (Sangli) आणि भिंवडीच्या जागेवरून आघाडीतील मित्रपक्ष आमने-सामने आले आहेत. ठाकरे गटाने चर्चा न करता सांगलीतील आपला उमेदवार जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, तर सांगलीची जागा आमचीच असल्याचा दावा शिवसेनेकडून (Shivsena) केला जात आहे. त्यामुळे मविआमध्ये अद्यापही जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आघाडीतील जागावाटपाच्या याच वादावर बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी, 'महाविकास आघाडी आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं वक्तव्य केलं आहे.

सध्या राज्यातील विविध मतदारसंघांत कोणता उमेदवार द्यायचा यावरून राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, काही जागांसाठी मित्रपक्षांमध्ये वाद सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे. मग सांगली (Sangli) भिवंडीवरून आघाडीत तर नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. मात्र, युतीपेक्षा आघाडीमध्ये जास्त मतभेद असून, जागावाटपारून आघाडीतील नेत्यांमध्ये रोज वाद सुरू असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाजन म्हणाले, "खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) आमच्याकडे आली आहे. पाच-सात लोकं शरद पवारांकडे (Sharad Pawar) तर पाच-सात आमदार हे उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) राहिलेले आहेत. ही जागा मला ती जागा मला यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये रोज वाद सुरू आहेत, त्यांची रोज भांडणं होत आहेत. त्यांची युती आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडीचं राज्यात काही खरं नाही, त्यामुळे या देशात आणि राज्यामध्ये अनुकूल परिस्थिती ही भाजपला आहे." महाजन यांच्या या वक्तव्यामुळे खरंच आघाडीत बिघाडी होणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknnath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर तब्बल अडीच तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT