ZP election  sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra elections: मोठी बातमी : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला होणार मतदान

Political News : राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसाचा दुखवटा आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कमी कालावधी मिळणार होता.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसाचा दुखवटा आहे. त्यामुळे प्रचार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कमी कालावधी मिळणार होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाची (Election Commison) गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. राज्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 5 फेब्रुवारीला होणार होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग गुरुवारी जाहीर केला.

यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार मतदानासाठी तीन ते चारच दिवस दिले जातात. यावेळी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार होता. याचा अर्थ प्रचाराला सात दिवस देण्यात आले होते. मात्र, राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा 30 जानेवारीपर्यंत होणार नाहीत. त्यामुळे आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.

त्यामुळे आता निवडणूक आयोगाने पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असताना मोठा नेत्याचे निधन झाल्याचा प्रसंग आधी उद्भवलेला नव्हता. असे पहिल्यांदाच घडला असल्याने सर्व बाबींचा विचार करून निवडणूक आयोगाने गुरुवारी निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा निवडणुका सुधारित कार्यक्रम.pdf
Preview

निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यक्रमानुसार आता सुधारित कार्यक्रमाची घोषणा जिल्हाधिकारी 31 जानेवारीला करणार आहेत. तर 7 फेब्रुवारीला मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत करता येणार आहे तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. तर निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात 11 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT