Chhagan Bhujbal News : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंचा फटका बसल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांमध्ये तथ्य नाही. मराठा आंदोलनाचा परिणाम मराठवाड्यात फक्त दोन तीन जिल्ह्यांमध्येच झाला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. जर, मराठा आरक्षणाचा फटका बसला तर मग अमोल कोल्हे कसे निवडून आले, असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.
छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसला नाही. मराठा आंदोलन फक्त मराठवाड्यात होते. विदर्भात मराठा आंदोलनाचा परिणाम नाही. तेथे मोर्चे देखील निघाले नाहीत. मात्र, तेथे दहा पैकी केवळ तीनच जागा महायुतीने जिंकल्या.
महायुतीमध्ये अजित पवारांना Ajit Pawar घेतल्याचा फटका बसल्याची चर्चा आहे. त्यावर भुजबळ म्हणाले अजितदादा प्रामाणिक नेते आहेत. विदर्भात भाजपला फटका बसला आहे. तसेच एका भाजप आमदारांच्या मतदारसंघात देखील भाजप पिछाडीवर आहे.
छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील आपल्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला. विधानसभेची 1985 ची पहिली निवडणूक 'मशाल' चिन्हावर लढलो. त्यावेळी शिवसेनेकडून अनेक दिग्गज उभे होतो. त्या निवडणुकीत आपण विजयी झालो.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.