औरंगाबाद : शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस डिवचण्याचा प्रयत्न करत असून निधीवाटपात राष्ट्रवादीकडून (Ncp) दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) शिवसंपर्क अभियानासाठी जालना येथे रवाना होण्यासाठी खासदार बारणे मंगळवारी (ता. २२ ) सकाळी औरंगाबादमध्ये आले होते. या दौऱ्यात त्यांनी एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी केली जात आहे की करायला लावली जात आहे याचा शोध घेतला पाहीजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी काँग्रेस गैरफायदा घेत आहे. बारणे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली असली तरी शिवसेनेचे दुसरे खासदार विनायक राऊत यांनी मात्र बारणे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
बारणे यांनी केलेल्या विधानाविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, बारणे काय म्हणाले हे मला माहित नाही. त्यामुळे त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. निधी वाटपात मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना समान न्याय दिला आहे. एवढेच काय भाजपच्या आमदारांना देखील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांइतकाच निधी दिला आहे.
त्यामुळे दुजाभाव करण्याचा विषय निर्माण होत नाही. मावळ लोकसभेच्या जागेविषयी मागणी केली जाणे स्वाभाविक आहे, कोणीही मागणी करु शकतो, पण त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, त्याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असे स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.