Shiv Sena leader Sanjay Shirsat addressing the media after the Shiv Sena–BJP alliance collapsed ahead of the Chhatrapati Sambhajinagar municipal elections. Sarkarnama
मराठवाडा

BJP Shivsena alliance : 9 बैठकांनंतरही भाजप नेत्यांचा रिप्लायच नाही, म्हणून युती तुटली : अतुल सावे, संजय केनेकरांच्या वागण्यावर शिरसाट फाडफाड बोलले...

Chhatrapati Sambhajinagar BJP Shivsena alliance break : 'राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना भाजप पक्षाची युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आम्ही पुढे जात होतो. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यासोबत आम्ही नऊ बैठका केल्या.'

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 30 Dec : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत अखेर नऊ बैठकांच्या मॅरेथॉन प्रयत्नानंतरही शिवसेना भाजपमधील युती तुटली आहे. भाजपच्या प्रत्येक स्थानिक नेत्याने युती कशी तुटेल असेच प्रयत्न केले. प्रस्तावांवर दोन्हीकडून एकमत झाल्यानंतर वेळोवेळी त्यात मेख मारण्याचे काम सातत्याने शेवटपर्यंत केले गेले.

आम्हाला झुलवत ठेवायचे आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांना मात्र अर्ज भरा, असे सांगायचे असा कुटील डाव भाजपने खेळला. आम्ही मात्र मित्रावर विश्वास ठेवणारे असल्यामुळे आतापर्यंत आशा बाळगून होतो. मात्र आता आम्ही सर्व आमच्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले असून थोड्याच वेळात त्यांना एबी फॉर्म देणार आहोत, असं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी जाहीर केले.

राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना भाजप पक्षाची युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आम्ही पुढे जात होतो. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यासोबत आम्ही नऊ बैठका केल्या. परंतु शेवटपर्यंत काय आत्तापर्यंत ही भाजपकडून कुठल्याही प्रकारचा अंतिम प्रस्ताव फोन किंवा निरोप आमच्याकडे आला नाही.

त्यामुळे भाजपला युती करायची नाही हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे ही युती तुटली आहे. याला पूर्णपणे भाजपचे स्थानिक नेतेच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार संजय शिरसाट यांनी केला. छत्रपती संभाजीनगर हे शहर संवेदनशील आहे. या शहरात केलेली एकही छोटीशी राजकीय चूक अत्यंत महागात पडू शकते याची जाणीव दोन्ही पक्षातील नेत्यांना होती. परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांना सुरुवातीपासूनच युती करायची नाही, अशा मानसिकतेत असल्यामुळे वारंवार त्यांनी युतीमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अखेर युती तुटण्यात झाला आहे.

भाजपचा आरोप त्यांच्यातच समन्वय नव्हता..

दुसरीकडे भाजपचे मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय केनेकर यांनी मात्र संजय शिरसाट यांचे आरोप फेटाळून लावताना त्यांच्या पक्षातच समन्वय नसल्याचा आरोप केला. अतुल सावे म्हणाले, आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी आशावादी होतो आज सकाळीही आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो. परंतु त्यांनी आमच्या सीटिंग नगरसेवकांच्या जागा मागत युती कशी होणार नाही याचाच प्रयत्न केल्याचा आरोप सावे यांनी केला.

तर संजय केनेकर यांनी काल रात्री शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या समर्थकांसह शिरसाट यांच्या बंगल्यावर काढलेल्या मोर्चाचा दाखला देत पक्षामध्ये संजय शिरसाठ यांच्या विरोधातच मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यांच्या जिल्हाप्रमुखानेच युती तोडण्याची भाषा केली यावरून अहंकार आणि युती न करण्याची इच्छा कोणाची होती हे स्पष्ट होते, असे सांगत युती तोडण्याला भाजप नाही तर शिवसेनेतील समन्वयाचा अभाव आणि त्यांच्या नेत्यांमध्ये असलेला संभ्रम हेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT