Manoj Jarange On Maratha Reservation News : Eknath Shinde  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange CM Call : मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची फोनवर चर्चा; आज उपोषण साेडणार ?

Manoj Jarange On Maratha Reservation News : "मुख्यमंत्री आंदोलनस्थळी यावेत, तरच उपोषण..."

Chetan Zadpe

Jalna News : मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारला एक महिन्याचा अवधी दिला आहे. मात्र, या महिनाभराच्या काळातदेखील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रमुख पाच मागण्या करत जरांगे यांनी सरकारला एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावेत, असा निर्वाणीचा इशारा दिला. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे. या वेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मागील १६ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र, आज ते उपोषण सोडणार असल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्यासोबत 15 मिनिटे चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची फोनवर सकारात्मक चर्चा झाली, असे जरांगे पाटील यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याबाबत आवाहन केलं. मात्र, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी उपस्थित राहिल्यानंतर आपण उपोषण सोडू, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री स्वत: आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारकडे काही प्रमुख अटीही ठेवल्या आहेत.

जरांगे पाटलांनी सरकारसमोर कोणत्या अटी ठेवल्या ?

- अहवाल कसाही आला तरीही मराठ्यांना ३१ व्या दिवशी कुणबी प्रमाणपत्र राज्य सरकारने द्यावे.

- मराठा आंदोलकांवर राज्यभरात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.

- लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी.

- उपोषण सोडताना राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहावेत. तसेच खासदार उदयनराजे भोसले आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मध्यस्थीने मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे.

- राज्य सरकार व मराठा समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून उदयनराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती हे दोन राजे हवेत. त्यानंतर मी उपोषण सोडतो, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT