Raj Thackeray-Devendra Fadanvis
Raj Thackeray-Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadanvis : राज ठाकरे सत्यच बोलले, शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला..

सरकारनामा ब्युरो

नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या गुडीपाडवा मेळाव्यात सत्यच सांगितले. २०१९ मध्ये शिवसेना व भाजप एकत्रित लढले, आम्हाला जनतेने बहुमत दिले. शिवसेनेच्याही जागा वाढल्या. पण शिवसेनेने (Shivsena) बहुमताचा अनादर केला, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आले, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा (Devendra Fadanvis) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरोपाचे समर्थन केले.

नादंडे दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना राज ठाकरे यांच्या काल झालेल्या सभेवर थोडक्यात भाष्य केले. जिल्ह्यातील ज्येष्ठ दिवंगत नेते तथा माजी राज्यमंत्री गंगाधर देशमुख कुंटुरकर यांच्या प्रेरणास्थळ या स्मारकाचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांनी फडणवीस यांना राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेत केलेल्या आरोपा संदर्भात प्रश्न विचारला.

यावर फडणवीस म्हणाले, राज ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे. २०१९ च्या विधानसाभा निवडणुका या शिवसेना-भाजप एकत्रित लढले होते. राज्यातील जनतेने दोन्ही पक्षांना भरभरून मतदान केले. बहुमातासह आमची सत्ता आली होती, पण ऐनवेळी शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला.

जनतेने दिलेल्या बहुमताचा अनादर करत कपटनितीने शिवसेनेने राष्ट्रवादी-काॅंग्रेस सोबत युती केली आणि तीन पक्षांचे सरकार सत्तेत आले. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आम्ही या संदर्भात वेळोवेळी सांगत आलो आहोत. राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात हाच मुद्दा मांडल्याचे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT