Manoj Jarange Patil With MLA Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : उमेदवार उभे करायचे की पाडायचे ? निर्णयाआधीच सत्ताधारी आमदार जरांगे यांच्या भेटीला..

Jagdish Pansare

दिलीप दखणे

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. विशेषतः मराठवाड्यात महायुतीचा एकमेव खासदार निवडून आला, तर इतर सात लोकसभा मतदारंघात युती चारीमुंड्या चीत झाली. अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर सरकारने निर्णय घेतलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत थेट उमेदवार उभे करायचे? की पाडायचे? याचा फैसला जरांगे पाटील बैठक घेऊन लवकरच घेणार आहे.

या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या मराठवाड्यातील (Maratha Reservation) काही आमदारांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटी यांची भेट घेऊन त्यांना शासनाच्या भूमिकेची माहिती दिली. आमदार राजेंद्र राऊत, नारायण कुचे, राणा जगजितसिंह, बालाजी कल्याणकर आज शनिवारी (ता.3) अंतरवाली सराटी येथे आले होते. या शिष्टमंडळ व जरांगे पाटील यांच्यात तासभर चर्चा झाली. मराठा आरक्षण बाबत शासनाची भूमिका, निर्णय यावर दोघांमध्ये चर्चा झाली.

आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना शासनाची भूमिका, होत असलेले निर्णय याची माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे विश्वास या आमदारांनी जरांगे पाटील यांना दिला. आमची जी मागणी आहे ती तेरा तारखेपर्यंत शासनाने निकाली काढावी. आम्हाला राजकारणात यायचे नाही, आरक्षणाच्या आडुन आम्हाला राजकारणात जायचे नाही,आमची मागणी पुर्ण होत नसल्यामुळे उमेदवार उभे करणे बाबत विचार करावा लागत, असल्याचे जरांगे पाटील यांनी या सत्ताधारी आमदारांना सांगितले.

सरकारकडे बहुमत आहे, सत्ता आहे, विरोधक बैठकीला आले नाही म्हणून तुम्ही निर्णय घेणार नाही का? ते येतील अथवा न येतील जबाबदारी तुमची आहे, तुम्ही त्यांना बोलावे जबाबदारी शासनाची आहे. (Manoj Jarange Patil) ते आले नाही तर त्यांना जाब विचारायला समाज खंबीर आहे, तो आम्ही विचारू, अशा शब्दात सरकारच्या वेळकाढूपणावर जरांगे पाटील यांनी बोट ठेवले. भाजपा आमदार दरेकर खोट बोलुन जनतेची दिशाभूल करत आहे.

षडयंत्र रचले जात आहे, बदनामी केली जात आहे, समाजाला सर्व माहिती आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचले तरी फरक पडणार नाही. आम्ही आरक्षणावर ठाम आहोत,लढा सुरूच राहील, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे या आमदारांना सांगितले. सरकारला वेळ दिला आहे, संधी दिली आहे आता निर्णय का घेत नाही? शासनाने शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले आदी नेत्यांसोबत बोलावे.

ते बैठकीला आले नाही तरी तुमच्या कडे सत्ता आहे, बहुमत आहे तुम्ही आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी पुन्हा केली. मराठा कुणबी एक आहेत, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे. सरसकट राज्यातील मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्या.

सगे सोयरे कायद्याची आमच्या व्याख्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, हैद्राबाद, सातारा आदी ठिकाणचे गॅझेट स्विकारा, मुलींना विना अट मोफत शिक्षण लागु करा, शिंदे समितीला मुदतवाढ एक वर्षाकरीता द्यावी, समीतीने मुदतीत नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न करावे, या मागण्याची आठवण जरांगे पाटील यांनी या आमदारांना करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT