Imtiaz Jalil On Bhumre News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil On Bhumre : इम्तियाज यांची विनंती भुमरेंनी धुडकावली..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे, तर राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले. अशा अधिवेशन काळात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेता येत नाही. (Imtiaz Jalil On Bhumre) जिल्ह्याचा खासदार म्हणून माझ्यासाठी डीपीडीसीची बैठक अत्यंत महत्वाची आहे. परंतु अधिवेशन सुरु असतांना पालकमंत्र्यांनी ही बैठक उद्याच (ता.७) ठेवली आहे.

डीपीडीसी बैठकीची पालकमंत्र्यांना एवढी घाई का झाली आहे? असा सवाल करत ही बैठक पुढे ढकलून ११ ऑगस्ट नंतर म्हणजेच संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर घ्या, अशी मागणी करणारे पत्र खासदार इम्तियाज जलील यांनी (Guardian Minister) पालकमंत्री संदीपान भुमरे यांना पाठवले होते. मात्र भुमरे यांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यामुळे आता नियोजित तारखेनूसार उद्या (ता.७) डीपीडीसीची बैठक सकाळी ११ वाजरा होणार आहे. आता या बैठकीवरून पालकमंत्री आणि इम्तियाज जलील यांच्यात वादाची थिणगी पडण्याची शक्यता आहे.

पत्र देऊन देखील पालकमंत्री उद्याच बैठक घेण्यावर ठाम असल्याने इम्तियाज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच उद्याची बैठक रद्द करून ती ११ ऑगस्ट नंतर ठेवावी, अशी मागणी भुमरे यांच्याकडे पत्राद्वारे यापुर्वीच केली होती. (Aurangabad) मात्र भुमरे यांनी इम्तियाज यांची मागणी धुडकावत उद्याच बैठक घेण्याचे ठरवले आहे. सध्या दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. ७ ऑगस्टलाच इतक्या धावपळीत बैठक घेण्याचे कारण काय? इतक्या धावपळीत बैठक का घेण्यात येत आहे ? सर्वसामान्य नागरीकांच्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे ?

विशेष म्हणजे कोणत्याही अधिवेशना दरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक घेता येत नाही? असेही इम्तियाज यांनी पत्रात नमूद केले होते. जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांना देखील इम्तियाज यांनी पत्र पाठवले होते. लोकसभेचे अधिवेश दिनांक ११ ऑगस्ट पर्यंत सुरु असल्याने आणि सभागृहात देशातील अतिशय महत्वपूर्ण बाबींवर चर्चा होत असल्याने तिथे उपस्थित राहणे अत्यावश्यक असल्याचे इम्तियाज यांनी सांगितले होते.

सर्वसामान्य नागरीकांचे व शेतकरी बांधवांच्या समस्यांचे निराकरण होणेस्तव,जिल्ह्यातील गोरगरीब गरजु विद्यार्थ्यांना सर्वसोयीसुविधा मिळाव्या, टिनशेडच्या वर्गखोल्योंचे पक्के बांधकाम व्हावे तसेच जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा याकरिता जिल्हा नियोजन समितीची बैठक अतिशय महत्वपूर्ण आहे. सबब बैठकीत मला सुध्दा अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करुन जनतेशी निगडीत प्रस्ताव मांडायचे आहेत, असे देखील या पत्रात नमूद करण्यात आले होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT