Marathwada Politics|
Marathwada Politics| 
मराठवाडा

Marathwada Politics जयंत पाटलांनी मराठवाड्याला फसवले ; सुरेश धस यांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

बीड : राष्ट्रवादीचे नेते माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील यांनी कोणताही निधी आणि मान्यता न घेता, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली खोटी निविदा काढून, मराठवाड्याची फसवणूक केली, असा गंंभीर आरोप भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी केला आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्नाबाबत कारवाई व्हावी, यासाठी वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार, असल्याचा इशारा आमदार धस यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषदेत आमदार धस यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ''आमदार सुरेश धस यांनी तब्बल 70 गावांना फायदा होणाऱ्या विकास कामांमध्ये खोडा घातला. धस यांनी कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना स्थगिती देण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. या प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये उपसा जलसिंचन योजना मधून मंजूर झाले होते. मात्र सुरेश धस यांनी पत्र दिल्याने या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्यात आली. असा आरोप बाळासाहेब आजबे यांनी केला.

त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन थेट जयंत पाटलांवर गंभीर आरोप केलेत. ''निधीची तरतूद नसताना, वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना, अशा प्रकारची खोटी निविदा काढताचं येत नाही. पण तरीही निविदा काढण्यात आली, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खोटी मान्यता दिली, असं आमदार धस यांनी सांगितलं. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी सभागृहात करणार आहे. आणि वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार आहे. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT