Jayant Patil News
Jayant Patil News Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil Reaction On Ayodhya Visit: देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या प्रश्नांशी राज्य सरकारला काही देणंघेणं नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या (Affected Farmers) नुकसानीबाबत राज्य सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. राज्यात सातत्याने विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यांचे निर्देश देणे, पंचनामे करून ताबडतोब मदत करणे, अशी कोणतीही भूमिका राज्य सरकार घेत नाही, अशी टीका (Ncp)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात असताना, त्याला मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसले होते. देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय. महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या प्रश्नांशी सरकारला काही देणंघेणं नाही.

त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचे व त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचे काम सध्या हे सरकार करत असल्याचेही पाटील म्हणाले. राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधी झालेल्या नुकसानीचेच पंचनामे आणि मदत अद्याप मिळालेली नाही, त्या हे संकट ओढावल्याने शेतकरी खचत चालला आहे.

अशावेळी त्यांच्या बांधावर जावून त्याला दिलासा देण्याची गरज आहे. पण सरकार अयोध्या दौऱ्यात व्यस्त आहे. आता तरी सरकारने तातडीने यंत्रणांना आदेश देवून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी, अशी अपेक्षा देखील पाटील यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT