Mumbai News : धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या वीज प्रश्नांवर धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, परीक्षांच्या काळात अनेक ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी मुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणाकडून झालेल्या चुकीमुळे अनेजणांची वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अव्वाचे सव्वा बिल आले असल्याने एकदम इतके बिल भरणे नागरीकाना शक्य होणार नाही त्यामुळे त्या बिलाच्या रक्कमेचे हफ्ते पाडून द्यावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मागणी मान्य करीत हे आदेश दिले आहेत.
धाराशिव जिल्हयात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणाकडून झालेल्या चुकीमुळे अनेजणांची वीज पुरवठा खंडित झाला आहे. अव्वाचे सव्वा बिल आले असून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, तसेच एकदम इतके बिल भरणे नागरीकाना शक्य होणार नाही त्यामुळं त्या बिलाच्या रक्कमेचे हफ्ते पाडून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. अनेक ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणी मूळ वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील मीटर चांगले असतानाही नवीन स्मार्ट मीटर बसवले आहेत. बिलाची रक्कम नोव्हेंबरमध्ये 700 रुपये तर डिसेंबरमध्ये 800 रुपये होती. तेच बिल जानेवारीमध्ये पंधरा हजारच्या घरात आले आहे. या बिलामध्ये दुरुस्ती करण्यात यावी तसेच हफ्ते पाडून देण्याची मागणी आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कैलास पाटील यांची मागणी मान्य केली आहे. असे हफ्ते पाडून देण्यात अडचण नाही पण बिल मात्र भरावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले. वीज बिलाचे दर कमी केले असून स्मार्ट मीटर बसवले त्यांना दहा टक्के बिलामध्ये सवलत देण्यात आली आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे आता हफ्ते पाडून वीज बिल भरण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.