Bhgat singh Koshyari
Bhgat singh Koshyari Sarkarnama
मराठवाडा

Koshyari : चाणाक्य नसते तर चंद्रगुप्त अन् समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कुणी विचारले असते ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आपल्या देशात गुरुची परंपरा आहे, गुरुचे महत्त्व मोठे आहे समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. समर्थ रामदासांमुळे सत्ता मिळाली असे शिवाजी महाराज म्हणाले. (Bhgat singh Koshyari) गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या देणार म्हणाले होते. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. (Shivaji Maharaj) राजा-महाराजा चक्रवर्ती सब, चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कोण पूछेगा ? असे वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपालांनी हे विधान केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले, आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. शक्तीची सर्वत्र पूजा होते, राम मंदिरात कार्यक्रम सुरू असतांना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले, ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो.

गुरूची शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते. माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत, पण आपल्या देशात गुरुची परंपरा आहे, गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे असे मतही कोश्यारी यांनी व्यक्त केले. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे. समर्थ रामदासांमुळे सत्ता मिळाली असे शिवाजी महाराज म्हणाले. गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या समर्थांना ते देणार होते.

संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. `राजा-महाराजा चक्रवर्ती सब गुरू बिना कुछ भी नही. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कोण पूछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कोण पूछेगा, मै शिवाजी और चंद्रगुप्त का छोटा नही बता रहा, लेकीन गुरू का बडा स्थान होता है `. मै शिवाजी और चंद्रगुप्त को छोटा नही बता रहा, लेकीन गुरू का बडा स्थान होता है, असेही कोश्यारी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT