Latur mourn after a father’s Death due to denial of Mahadev Koli caste certificate, Sarkarnama
मराठवाडा

Latur News : 'माझी 2 लेकरं शिकतायत, मी मजुरी करतो पण हे सरकार प्रमाणपत्र देईना म्हणून करंटला धरून...'; हतबल बापाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

Mahadev Koli caste certificate : माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय..."; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे.

Jagdish Patil

Latur News, 14 Sep : "माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय..."; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकजन आरक्षणासाठी आपलं जीवन संपवत आहेत . अशातच आता मुलांना शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने एका पित्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावातील शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (32) नावाच्या व्यक्तीने जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शनिवारी (ता.13) संध्याकाळी विजेच्या प्रवाहाचा धक्का घेत जीवन संपवलं.

मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी त्यांच्या मुलांना जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना ते प्रमाणपत्र मिळाले नाही. प्रमाणपत्र नसल्याने मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. अशातच कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणावामुळे त्यांनी आपलं जीवन संपल्याचं सांगितलं जात आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय?

शिवाजी मेळ्ळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये लिहिलं की, 'माझे दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतो. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही, हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.'

या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे महादेव कोळी समाजाच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीवर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाला उर्वरित महाराष्ट्रात लाहू असेलेले निकष लावून जात प्रमाणपत्र द्यावी आणि व्हॅलिडीटी सोपी करावी या मागीसाठी आंदोलन केलं होतं. शिवाय 17 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात आंदोलनासाठी हाक दिली होती. अशातच आता मेळ्ळे यांच्या आत्महत्येमुळे हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT