Manoj Jarange Patil News : Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : दगडफेक प्रकरणात अटक झालेल्या तरुणांचा जरांगेंनी केला बचाव; "हा तर सरकारचा डाव..."

Chetan Zadpe

Marathwade News : जालना येथील अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या पोलिसांवरील दगडफेकप्रकरणी अटक केलेल्या ऋषिकेश बदरेच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा काहीच गुन्हा नाही, असे म्हणत बचाव केला आहे. कार्यकर्त्यांचा कोणताच दोष नाही. सरकारने अटक करणं, हा डाव आहे. पोलिस अधिकारी तुषार दोषींच्या केवळ बदलीने काही होणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे, तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार, यावरही जरांगे ठाम आहेत. (Latest Marathi News)

जरांगे म्हणाले, अंतरवालीतील कोणत्याही कार्यकर्त्याचा दोष नाही. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. सरकारने सांगितलं होतं की, आम्ही हे गुन्हे मागे घेतोय. कुणालाही अटक केली जाणार नाही. आता सरकारने अटक करणं, हा सरकारचा कोणता डाव आहे? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जे कोणी दोषी आहेत, त्यांची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे. दोषी अधिकाऱ्यांची केवळ बदली करून चालणार नाही. कारण निष्पाप जनता तिथे बसली होती. त्यांच्यावर भीषण असा लाठीमार झाला आहे. तिथल्या कार्यकर्त्यांवर प्रचंड अन्याय झाला आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, तेच आमच्याकडे आले होते. कारण ३०७ सारखे गंभीर कलमं आमच्यावरती लावली, आम्ही असा कोणता हत्येचा कट रचला होता? असा उद्विग्न सवाल जरांगेंनी उपस्थित केला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT