Mumbai News : मंत्री धनंजय मुंडे काल भगवान गडावर जात तिथं मुक्काम ठोकला. न्यायाचार्य नामदेवशास्त्री महाराज यांच्याशी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर नामदेवशास्त्री महाराज यांनी मंत्री मुंडे यांची पाठराखण करणारे विधान केले.
नामदेवशास्त्री महाराज यांच्या या भूमिकेवर चारही बाजूने टीका होत असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगले भडाकले आहे. 'विकृतपणे केलेल्या कामाला समाज पाठीशी घालत नाही. तसेच वंजारी समाजाला ही हे मान्य नाही', असा टोला मनोज जरांगेंनी नामदेवशास्त्री महाराजांना लगावला आहे.
मनोज जरांगे यांनी भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री, असे काही बोलले असतील, असे मला वाटत नाही. संत-महंत समाज घडवणारे एक न्याय मंदिर आहे. ते एक मोठं श्रद्धास्थान आहे. खंडण्याबद्दल ते बोलतील, असे वाटत नाही. तसेच जो व्यक्ती त्या ठिकाणी गेला आहे, त्याला कुठे-कुठे हात पसरावे हेच कळत नाही. कोणत्याही विकृतीला समाज पाठीशी घालत नाही. तसेच वंजारी समाजाला देखील ते मान्य नाही, असे म्हटले.
नामदेवशास्त्रींनी आरोपींचे समर्थन केले असल्यास, ते या राज्याचे मोठं दुर्दैव ठरेल. एकप्रकारे गुंडगिरीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. असं काही बोलले असतील, तर ते भयंकरच आहे. यातून राज्याची मोठी हानीच आहे. खून केल्याचा आंनद आणि गुन्हेगार यांना सोडून द्या, असा त्याचा अर्थ निघेल, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मंत्री मुंडेंची पाठराखण करणाऱ्या नामदेवशास्त्रींवर तोफ डागली.
नामदेवशास्त्रींच्या पाठराखणीचा संप्रदायवर परिणाम होण्याचं काही काय कारण नाही. गुंड हे संप्रदाय चालवत नाही. ते काही बोलले असतील तर दुरुस्त करतील. त्यांना एकच बाजू सांगितली गेली आहे. त्यातून त्यांना उगाच बोलवायला लावले असेल, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
मंत्री धनंजय मुंडे काल भगवान गडावर मुक्कामी होते. या दोघांची भेट झाल्यानंतर नामदेवशास्त्री यांनी मंत्री मुंडे यांच्या भूमिकेवर भाष्य केले. "मंत्री मुंडे यांच्या पाठिशी आपण भक्कमपणे उभे आहोत. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही, असे मी शंभर टक्के सांगतो. जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही, गोपीनाथ मुंडे यांचा तो पुतण्या आहे. त्यांचे मित्र राजकारणात आहे.आज मुंडेंच्या हाताला सलाईन आहे, संवेदनशील मुद्दावरुन राजकारण करणं ही चुकीची पद्धत आहे", मंत्री मुंडे यांची अशी पाठराखण नामदेवशास्त्री यांनी केली.
इथं माणसाला मारलं आहे. त्याच्या रक्ताची माया दया नाही का? तुमच्यावर फाशीची वेळ आली म्हणून बाबाजींचा आसरा घेण्यासाठी गेले. बाबाजींना यात ओढलं जात आहे. धनंजय मुंडे वातावरण दूषित करत आहेत. न्यायाची अपेक्षा न करणे आणि गुंड सांभाळणे, असाच त्याचा अर्थ निघतो. यातून हे प्रकरण वेगळ्या दिशेनं जात असून, राज्यात भयंकर मॅसेज जाणार आहे, अशी भीती देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.