औरंगाबाद : समाजाच्या नावावर कोणी आमदार, खासदार होतयं, पण राजकीय स्वार्थासाठी समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ते फसवणूक करत आहेत. (Maratha Reservation) मराठा तरुणांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून प्रचंड रोष आहे, त्यामुळे आता आमचा अंत न पाहता, सरकारने तोडगा काढवा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी केली.
तसेच सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा तातडीने सोडवला नाही, तर येत्या नोव्हेंबरमध्ये मंत्रालयावर लाखांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. (Aurangabad) औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाज आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले. (Maharashtra)
येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. जावळे म्हणाले, राज्यात शांतते आणि लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात आले. पण अनेकदा मागणी करूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही.
राज्यात नव्यानेच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आता समाजाचा अधिक अंत न पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. या शिवाय राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत. यासाठी मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात दौरे काढून नोव्हेंबरमध्ये मंत्रालयावर लाखोंचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील जावळे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.