Marathwada Politics News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने केलेला तपास हा योग्य आणि आरोपींना फासावर चढवण्याची शिक्षा होण्यासाठी पूरक आहे. सगळ्या आरोपींचा या खून प्रकरणातील सहभाग आणि इतर गोष्टी बारकाव्याने दोषारोपपत्रात स्पष्ट करण्यात आल्या आहेत. अत्यंत कमी वेळात सीआयडीने या खून प्रकरणात तपास करून दोषारोपपत्र सादर केले. पोलिस, सीआयडी यांच्या कामाबद्दल मी समाधानी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने दणाणून गेले. सरंपच संतोष देशमुख खून प्रकरणातील चार्जशीटवरही सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने परिसरात चर्चा होताना दिसली. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळके यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सीआयडीच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केले.
वाल्मीक कराड हाच या खूनाचा मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड असल्याचे आम्ही सुरूवातीपासून सांगत होतो. सीआयडी तपासात हे स्पष्ट झाले. कराड यांच्यासह इतर आरोपींची सगळी कुंडली दोषारोपपत्रात मांडण्यात आली आहे. आरोपींना सुटण्याची कुठलीच संधी तपास यंत्रणा आणि पोलिसांनी ठेवलेली नाही. अतिशय योग्य पद्धतीने तपास झाला आहे. सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती केल्याने निश्चितच आरोपींना फाशीची शिक्षा होईल, असा विश्वास सोळंके (Prakash Solanke) यांनी व्यक्त केला.
नैतिकतेची चाड असले तर राजीनामा द्या..
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मी केली नव्हती. परंतु वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत त्यांचा मतदारसंघ, पालकमंत्री असताना जिल्ह्याचा कारभार सांभाळत होता. अगदी जिल्हा नियोजन समितीतही त्याचा हस्तक्षेप होता. आता खून प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोप असल्याचे स्पष्ट झाल्याने धनंजय मुंडे यांना खरचं नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. तो घ्यायचा की नाही? हा निर्णय अजित पवारांनी घ्यायचा आहे.
बीड जिल्ह्यात कशा प्रकारचा कारभार चालतो हे आम्ही अजित पवार यांच्या कानावर चार वर्षापुर्वीच घातले होते. पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. आता ते स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी नव्याने कळतील. पालकमंत्री म्हणून ते बीडवर अधिक लक्ष देतील अपेक्षा आहे. राहिला प्रश्न धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा तर तो नैतिकता म्हणून त्यांनी द्यावा. सरंपच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाल्यावर त्यांनी पुन्हा मंत्री पदावर यावे, त्यावर कोणाचा आक्षेप असणार नाही, असेही प्रकाश सोळंके म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.