Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Samta Parishad : छगन भुजबळांची समता परिषद 'इलेक्शन मोड'वर; अजितदादांसह महायुतीचं टेन्शन वाढवलं

Samata Parishad Political Strategy : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याची तयारी छगन भुजबळांची समता परिषदेकडून सुरू असल्याचे चित्र आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांची महात्मा फुले समता परिषद 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर आहे.

समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी धाराशिव इथं घेतलेल्या आढावा बैठकीत, स्थानिक स्वराज्य संस्थंच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचा अन् गाव तिथं शाखा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. समता परिषदेच्या या निर्णयामुळे महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय आव्हान मिळालं आहे.

राज्यात महायुतीची (Mahayuti) सत्ता आली. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अ‍ॅक्टिव्ह झाल्याचं पहायला मिळत आहे. समता परिषदेचा मेळावा घेताना, राज्य अन् राष्ट्रीय दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अलीकडच्या काळात ते, भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वाधिक संपर्कात आहेत.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबरोबर समता परिषद देखील चांगलीच अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. समता परिषदेचे राज्या उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी धाराशिव इथं समता परिषदेची बैठक घेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी लागण्याच्या सूचना केल्या. मराठवाड्यात 'गाव तिथं शाखा' अन् 'घर तिथं समता सैनिक' ही मोहीम राबवण्याचं ठरवण्यात आलं. पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 100 शाखांचं उद्घाटन करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे.

"जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत. मात्र आमची वेळोवेळी फसवणूक झाली. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. मात्र ते आमच्यात आले, तर आम्हालाही काही मिळणार नाही आणि त्यांनाही काही नाही". त्यामुळे जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर आम्हाला 51% घोषित करा", अशी मागणी आज शेगाव इथल्या माळी समाजाच्या मेळाव्यात केली.

व्ही. पी. सिंह यांच्या या सांगण्यावरून 'OBC' समाजाची सेवा करतोय, अशा कार्यक्रमाला जाणे मी टाळतो. कारण समाज एक असला, तरी पक्ष वेगळे असतात, विचारसरणी वेगळी असते. मी 'OBC'च्या प्रश्नावर शिवसेना सोडली. मी नरसिंह राव यांच्याकडे गेलो. त्यावेळी नरसिंह राव यांनी 'OBC' समाजाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता. त्यातूनच समता परिषद स्थापन झाल्याचे, आदिवासी, दलित, ओपन आणि 'OBC' या चार वर्गात बाबासाहेबांनी समाजाला बांधलं. व्ही. पी. सिंहानी नंतर मंडळ आयोगासाठी काम केलं. त्यानंतर आरक्षण मिळाल्याचं, छगन भुजबळ यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT