Local Body Election News : निलंगा नगरपालिकेच्या निवडणुक स्थगितीचा निर्णय काल दुपारी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्याने राजकीय पक्ष चांगलेच संतापले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसने काल रस्त्यावर उतरत निवडणुक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरत निदर्शने केली होती. तसेच आज निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. परंतु व्यापाऱ्यांची नाराजी नको म्हणून काँग्रेस पक्षाने ऐनवेळी बंद मधून माघारीचा निर्णय घेतला. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी निवडणुक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाल्याची टीका केली आहे.
निवडणूक आयोग हे सरकारच्या विरोधातील बाहूले आहे. मतदान प्रक्रियेसाठी काही तास शिल्लक असताना निलंगा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक स्थगित करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन विकास आघाडी व काँग्रेसकडून निलंगा बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु व्यापाऱ्यांच्या नाराजी वरून काँग्रेसने या बंदमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बंदचे आवाहन कालच करण्यात आल्यामुळे सकाळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नाहीत. पण प्रमुख राजकीय पक्षांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुपारी बारानंतर बाजारपेठ नियमितपणे सुरू झाली आहे.
दरम्यान, मतदानाला काही तास शिल्लक असताना निलंगा परिषद निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाही विरोधी आहे, अशी टीका काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या नऊ ते दहा वर्षांपासून झालेल्या नाहीत. सत्ताधारी मंडळींकडून प्रशासनाच्या माध्यमातून एकाधिकारशाही गाजवता यावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या ना त्याकारणाने लांबवण्याचा प्रयत्न होत आहे.
कोणत्याही परिस्थितीत दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात याव्यात असा पंचायतराज कायदा सांगतो, मात्र तांत्रिक कारणावरून या निवडणुका पुढे जातील याची व्यवस्था राज्यातील सत्ताधारी मंडळीकडूनच होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कुठे निवडणुका जाहीर केल्या. परंतु, त्या सुरळीत पार पडणार नाहीत याची व्यवस्था या आयोगातमार्फतच केली जात आहे.
यांनी केला.
जेथे सत्ताधारी मंडळीच्या विरोधात जनतेचा कौल दिसतो, तेथील निवडणुका स्थगित करण्याचा सपाटा आयोगाने लावल्याचे रेणापूर नगरपंचायत आणि निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून दिसून येत आहे. मतदान चोरीच्या प्रकरणावरुन संपूर्ण देशात निवडणूक आयोगाच्या विरोधात रान उठलेले असतानाच, आता निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करून, आपण स्वायत्त नसून सत्ताधारी मंडळींच्या हातचे बाहुले असल्याचे सिद्ध केल्याचा आरोपही अमित देशमुख
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.