स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा इशारा दिला.
त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची दिवाळीही सुखाची होणार नाही.
शेट्टींच्या या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा उर्जा मिळण्याची शक्यता आहे.
Raju Shetty Visit Heavy Rainfall Affected Farmers : अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या. हे जमत नसेल तर किमान 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मदत द्या. दिवाळीपूर्वी ही मदत नाही मिळाली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी आम्ही नीट होवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती गंभीर नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजू शेट्टी रविवारी लातूर दौऱ्यावर होते.काल जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी संवाद साधला होता. आज लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली.
गेल्या चार दिवसांपासून लातूर, धाराशिवमधील जिल्ह्यातील नुकसानीची आम्ही पाहणी करीत आहोत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांची जमीन खरडून निघाली, गुरेढोरे वाहून गेलीत. निसर्गाच्या रौद्ररूपाला बघून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. हे नुकसान पाहून शासनाने अन्य योजना बाजूला सारून शेतकऱ्यांना 29 ऑगस्ट 2029 च्या शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ मदत दिली पाहिजे, असेही राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले.
हा शासन निर्णय स्वत: फडणवीस यांनीच त्यावेळी काढलेला आहे, तो यंदा लागू करावा. त्यात तिप्पट नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली होती. यासाठी राज्यभर आंदोलनेही केली होती. आजच्या परिस्थितीत आम्ही हीच मागणी लावून धरली आहे. पण, मदत करण्याऐवजी सरकार अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारचे धोरण घातक आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दबावामुळे सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टनामागे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शेट्टी यांनी पुन्हा केला. 15 रुपयांपैकी 5 रुपये शेतकऱ्यांना मदत आणि उर्वरित 10 रुपये सरकार ठेवून घेणार, हा काय प्रकार आहे? म्हणून सरकारच्या या निर्णयाची आम्ही होळी केली, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
1. राजू शेट्टी यांनी काय वक्तव्य केले?
राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा देत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा आंदोलन पेटेल असे म्हटले.
2. त्यांनी कोणाला उद्देशून इशारा दिला?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला.
3. शेतकऱ्यांची मागणी काय आहे?
दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, पीक विमा आणि कर्जमाफीसंबंधी निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
4. राजू शेट्टी कोणत्या संघटनेचे नेते आहेत?
ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि नेते आहेत.
5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे, तसेच नवीन आंदोलन उभे राहू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.