Raosaheb Danve on Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve on Kalyan Kale : 'काळे माझ्याविरोधात लढायला तयार नव्हते, पण..' ; दानवेंचं मोठं वक्तव्य!

Jagdish Pansare

Raosaheb Danve and Jalna Lok Sabha Constituency Election : 'जालन्यातून माझ्या विरोधात लढायला काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता. कल्याण काळेंनीही नकार दिला होता, पण आता जालन्यातून लढायचे नसेल तर विधानसभेला तिकीट मागयाला येऊ नका, असा दम त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी भरला होता. त्यानंतर काळेंनी माझ्याविरोधात अर्ज भरला.', असा दावा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काळे यांचे नाव न घेता केला.

भविष्यात विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद अशा अनेक निवडणूका लढून त्या जिंकल्या आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास कमी होऊ देऊ नका, असे आवाहन रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी आभार यात्रेच्या भाषणातून केले. शुक्रवारी सिल्लोड-सोयगाव, फुलंब्रीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभा निवडणुकीत काम केल्याबद्दल आभार मानले.

शनिवारी चिकलठाणा येथे दानवेंनी आभार दौरा करत पदाधिकाऱ्यांना चार्ज केले. लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण खराब झाले होते, त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. यात कार्यकर्त्यांचा दोष नाही. आता निराशा झटकून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. `मी निवडणूक हरलो तरीही तुमच्या सदैव सोबत आहे. तुमचे कुठलेही काम अडणार नाही.

सर्व अधिकाऱ्यांच्या खुट्या मला माहिती आहेत. पूर्वी तुमच्या कामासाठी फोन करत होतो, आता मोकळा झालोय, त्यांच्या छातीवर बसून काम करून घेतो, असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला. तुमच्या आशीर्वादाने मी 35 वर्षे लोकप्रतिनिधी होतो, 26 निवडणूका लढल्या, पण इंदिरा गांधी यांच्या लाटेत व 2024 च्या निवडणुकीत असा दोनच वेळा पराभव झाला.

प्रत्येक निवडणूक वेगळी असते. यावेळी राजकीय वातावरण खराब होते. त्यामुळे संपूर्ण राज्यातच आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही. हे अपयश मनावर घेऊन तोंड बारीक करून बसू नका. गावात तू विरोधात काम केले, तुला बघून घेतो, अशा कुणाला धमक्या देऊ नका, असे आवाहन दानवे यांनी उपस्थितांना केले.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करत दानवे म्हणाले, लोक आपल्याकडे आले पण त्यांच्या गावात भाजपला लीड मिळाली नाही. काही कार्यकर्ते माझ्या नेत्याचे नाव घेतले नाही, म्हणून तर काहीजण छोटे बॅनर्स मिळाले, बूथचे पैसे दुसऱ्याकडे दिले म्हणून नाराजी व्यक्त करतात. ही काही पराभवाची कारणे नाहीत. पराभवाचा कुणालाही दोष देता येणार नाही.

भविष्यात विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद अशा अनेक निवडणूका लढून त्या जिंकल्या आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्‍वास कमी होऊ देऊ नका. आता त्यांना म्हातारपणी पोरगा झाला आहे, त्यामुळे तुमच्या गावात ते येतील, बारसे करतील, कान, नाक टोचतील, अशा कार्यक्रमांना घाबरून न जाता, जोमाने काम करा, असे आवाहन दानवे यांनी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT