Samriddhi Highway Accident  Sarkarnama
मराठवाडा

Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची शरद पवारांनी दिली आकडेवारी; सरकारनं योग्य ती पावलं...

Mangesh Mahale

Pune : समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या वैजापूर येथे काल (शनिवारी) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असा सल्ला पवारांनी सरकारला दिला आहे. 'समृद्धी'वरील अपघातातील मृत्यू झालेल्या प्रवाशांची आकडेवारीच पवारांनी सांगितली आहे.

"समृद्धी महामार्गावर आजवर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, तर ४७ अपघातांच्या घटनेत आजवर १०१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे," असे टि्वट शरद पवारांनी केले आहे.

"वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच प्रार्थना,' असे टि्वट त्यांनी केलं आहे.

हा अपघात अत्यंत भीषण होता. हे सर्व प्रवासी बुलडाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन येत होते. अपघातात 23 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT