सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. हे प्रकरण गाजत असतानाच काल वाल्मिक कराड यांनी सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे.
वाल्मिक कराडने काल सरेंडर केलं, पण तीन फरार आरोपींचं काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 22 दिवसानंतरही हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींना पकडण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आरोपी अद्यापही मोकाट असून, सीआयडी (CID) तीन फरार आरोपींना पकडणार का? पोलिस आणि सीआयडीकडून त्यांचा शोध घेतला जाणार का? फरार आरोपींचं काय?, असा सवाल मस्सजोगमधील गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. आरोपींना अटक करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आदोंलन केले.
वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो इतक्या दिवस कुठे फरार होता. त्याला कोणता आका वाचवत होता. पोलिसांना इतक्या दिवस तो कसा सापडला नाही, असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे. मंगळवारी पुण्यात सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. तो जर पुण्यातच होता तर पोलिसांना (Police) त्याचा पत्ता कसा लागला नाही.
22 दिवस वाल्मिक कराड हा पोलीस आणि सीआयडीला गुंगारा देत होता. हे मागे कुणाचे षडयंत्र होते. हे महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे मोठे अपयश असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मीक याने व्हिडीओ रिलीज केला, स्वतःला क्लीन चिट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे, असा आरोपही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे..
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.