Beed Murder Case News Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News : सरपंच देशमुख खून प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका, केज पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर!

Sarpanch murder case- Cage police inspector on compulsory leave : पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण जितक्या गांभीर्याने घ्यायला हवे होते तितके ते घेतले नाही. म्हणूनच सरपंच देशमुख यांची हत्या झाली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Jagdish Pansare

बीड : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Beed News) खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग येऊ लागला आहे. तसेच या प्रकरणात आरोपींवर तातडीने करवारई केली जावी यासाठी वाढत असलेला राजकीय दबाव आणि विरोधकांकडून होत असलेली टीका पाहता पोलीस प्रशासनातील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. (Crime) त्यांचा अतिरिक्त पदभार पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह विरोधकांनी केला होता.

तसेच या खून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. बीड जिल्ह्यातील हे खून प्रकरण थेट दिल्लीत पोचल्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपीसह इतरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबद्दल असलेला संशय पाहता केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या कारवाईने बीड पोलीस प्रशासन हादरले आहे. मस्साजोग येथून सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी तपास सुरू केला मात्र काही तासातच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण जितक्या गांभीर्याने घ्यायला हवे होते तितके ते घेतले नाही. म्हणूनच सरपंच देशमुख यांची हत्या झाली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संशय बळवल्यामुळे आता या प्रकरणात कारवाई केली जात आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसापूर्वी देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग येथे जाऊन पर भेट घेतली होती. यावेळी त्यांनी देशमुख खून प्रकरणाचा तपास जिल्ह्याबाहेरील पोलीस यंत्रणेकडून करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता या खून प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT