Ambadas Danve News : संभाजी नगरचे पालकमंत्री पद मिळावे म्हणून भाजप नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, पालकमंत्री पदाची माळ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या गळात पडली. सत्तार यांची पालकमंत्री पदी नियुक्ती होताच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप नेत्यांना सुनावले.
'भाजपच्या लोकांना कोणी विचारत नाही. रावसाहेब दानवे यांनी आरोप केला होता सिल्लोड पाकिस्तान होत आहे. भाजपचे लोक रोज सत्तार यांच्या विरोधात आंदोलन करतात, आरोप करतात.मात्र भाजपच्या भूमिकेला कवडीची किंमत नाही,' असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
'माझा अब्दुल सत्तार किंवा संदीपान भुमरे यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. सर्वांना समसमान निधी मिळावा अशी माझी अपेक्षा होती. विकास जनतेचा अधिकार असून त्यात तुम्ही राजकारण कसं करू शकता, यावरून माझा आणि भुमरे यांच्यात वाद झाला.', असे अंबादास दानवे म्हणाले.
'सत्तार खूप नाही फक्त दोन महिन्यांचे पालकमंत्री आहेत. त्यांना खूप काम असतं. जिल्हाधिकाऱ्यांना दम देणे, जमिनी यात ते व्यग्र असतात. त्यामुळे त्यांना काम करायला वेळ मिळेल का? हे मला माहीत नाही. शिंदे दिल्लीत जाऊन काय काय करतील हे राज्यातील भाजपच्या लोकांना कळणार नाही.', असा टोला दानवे यांनी लगावला.
सत्ताधाऱ्यांनी अंधारात आंदोलकांशी बैठक करायची आणि आम्हाला भूमिका स्पष्ट करा, असे सांगायचे. सत्ताधारी पक्षाने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी. त्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू, असे दानवे म्हणाले.
लोकसभेत भाजपने मनसेचा वापर करून मराठी मते फोडण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा हाच उद्देश दिसतोय. लाडक्या बहीण-भावापेक्षा लाडक्या सुपाऱ्या जास्त प्रिय दिसतात. त्यांनी एवढ्या वर्षात सुपाऱ्याच घेतल्या, असे म्हणत दानवेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.