Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

स्थानिकसाठी भाजपचा 'एकला चलोचा नारा'? अजितदादांच्या शिलेदाराने दंडच थोपाटले, म्हणाला, 'त्यांनी तसेच ठरवलं तर आम्हीही...'

Sunil Tatkare On Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवाचे खापर ‘मविआ’वर फोडले. यानंतर राज्यात आता खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवाचं खापर थेट महाविकास आघाडीवर फोडलं असून, अंतर्गत अहंकारामुळे पराभव झाल्याचं मत मांडलं.

  2. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि ते एकदम बरोबर असल्याचं सांगितलं.

  3. तटकरे यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असेल, तर महायुतीही सज्ज असल्याचा इशारा दिला.

Parbhani News : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या गोष्टीला आता सात-आठ महिने होत असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खळबळ जनक वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर महाविकास आघाडीवर फोडले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरेंसह महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. त्यांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यानंमध्ये असलेल्या अहंकारामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते एकदम बरोबर असल्याचं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना लोकसभेत विजय आणि विधानसभेत पराभव झाल्याबद्दल प्रश्न केला होता. हा प्रश्न एका मुलाखतीत विचारला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, ईव्हीएम घोटाळा, बोगस मतदार, मतदार कसे वाढले याचे उत्तर सगळ्यांनाच माहित आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक होता. लोकसभेत उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेला निशाणी होती, मात्र जागा नव्हत्या. ज्या मिळाल्या तेथे उमेदवारीवरून तू तू मै मै झाली. तेथेच सर्वात मोठी चूक झाली. समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेचे यश सर्वांच्या डोक्यात गेला. महाविकास आघाडीच्या नेत्यानंमधील अहंकारामुळेच विधानसभेला मार बसला असे ते म्हणाले. या त्यांच्या वक्तव्यामुळे आता मविआत मिठाचा खडा पडला आहे.

यावरच तटकरे यांनी भाष्य केलं असून त्यांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. तटकरे यांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यानंमध्ये असलेल्या अहंकारामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते एकदम बरोबर आहे. ईव्हीएममुळे आमचा विधान सभेत विजय झाला असे कोणी म्हणत असेल तर लोकसभा निवडणुकीत आघाडीला मोठे यश मिळाले होते. तेंव्हा ते म्हणत होते की आम्ही कतृत्वाने जिंकलो.

मात्र त्यांचा फुगा विधानसभा निवडणुकीत फुटला. राज्यातील जनतेनं आम्हाला बहुमत दिलं. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल. दरम्यान या निवडणुका महायुती एकत्र लढणार का असा सवाल त्यांना केला असताना, त्यांनी यावर अद्याप चर्चा झालेली नाही. याबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील.

पण भाजप जर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असेल तर आमचीही तयारी सुरू असल्याची इशारा तटकरे यांनी भापला दिला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन मेळाव्याला मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

1. उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण काय सांगितलं?
उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवाचं कारण महाविकास आघाडीतील अंतर्गत अहंकार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं.

2. सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया दिली?
सुनील तटकरे यांनी ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला असून ते बरोबरच बोलत असल्याचं म्हटलं आहे.

3. तटकरे यांनी भाजपला कोणता इशारा दिला?
भाजप जर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असेल तर महायुतीही त्या लढाईसाठी पूर्णपणे तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT