Marathwada| CM Eknath Shinde
Marathwada| CM Eknath Shinde 
मराठवाडा

Marathwada|मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे खिसे रिकामे

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्व संध्येला स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लातुरचे आमदार अभिमन्यु पवार यांनी मराठवड्याचा (Marathwada) अनुशेष भरुन काढण्यासाठी विविध मागण्या मराठवाड्याच्या वतीने केल्या. या मागण्यांना उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काहीतरी ठोस घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र हे सरकार सर्व सामान्यांचे सत्कार असून या ठिकाणी मांडण्यात आलेल्या सर्व मागण्याचा गांभीर्याने विचार करण्यात येईल. एवढेच सांगितले. मात्र कुठलीही ठोस घोषणा केली नाही.

शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी श्री स्वामी रामानंद तीर्थ स्मारक व सेवाभावी संस्था परभणी आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विभागीय परिषदेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अभिमन्यु पवार यांनी त्यांच्या भाषणात मराठवाड्याच्या विकासासाठी विविध प्रलंबित मागण्याची आठवण यावेळी करुन दिली. त्यात प्रामुख्याने मागील तीन वर्षांपासून बंद असलेल्या मराठवाडा वैधिनिक विकास महामंडळाचा कारभार पुन्हा सुरु करावा. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी मंत्री मंडळाची एक बैठक औरंगाबादला होत होती ही बैठक गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही ती पुन्हा सुरु करावी. मराठवाड्याच्या हक्काचे १६ टिएमसी पाणी मिळत नाही ते मिळावे. वॉटर ग्रीड उपक्रम पुन्हा सुरु करुन , पश्चिम वाहीनी नद्यांचे जे पाणी समुद्रात वाहून जाते ते थांबवावे.

मराठवाड्यातील धरणांत फ्लोटींग पॅनल टाकून त्यातून वीज निर्मीती करावी, लातूरला वेगळे विभागीय आयुक्त कार्यालय सुरु करावे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शालेय उभ्यासक्रमात समाविष्ट करावा. हा इतिहास जपण्यासाठी व त्याचे डिजीटलायझेशल करण्यासाठी एस. आर.टी ला २५ लाखाचा निधी द्यावा. लातूरात उद्योग आणावे आणि औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला अजून चालना द्यावी. मुंबई येथे मराठवाडा भवनासाठी जी जागा दिली आहे ती लवकर मिळावी. या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यातील कुठल्यातरी मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ घोषणा करतील अशी आयोजकांची अपेक्षा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी केवळ वॉटर ग्रीड बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमची बैठक झाली आहे. इतर मागण्या देखील मान्य केल्या जातील. एवढेच आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, निशीकांत भालेराव, राजेंद्र जंजाळ, परिषदेचे अध्यक्ष जी. आर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचलन उदय वाईकर तर प्रास्ताविक जी. आर देशमुख यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT