Ujjwal Nikam, Valmik Karad News sarkarnama
मराठवाडा

Valmik Karad News : वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला, आता जामीनासाठी धडपड!

The court has dismissed the acquittal plea of Valmik Karad. He has now filed a bail application : वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर वाल्मिक कराडच्या संपत्ती अर्जावरील निर्णय राखून ठेवला.

Jagdish Pansare

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याचा दोषमुक्तीचा अर्ज बीडच्या विशेष न्यायालयाने फेटाळला. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मीक कराड याने जामीनासाठी धडपड सुरू केली आहे. तर विष्णू चाटे व इतर आरोपींनीही खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे म्हणून अर्ज दाखल केला.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. या दणक्यानंतर आता कराड याच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. गेल्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्ज व संपत्ती जप्त करण्याबाबत युक्तिवाद झाला होता.

विशेष सरकारी वकील उज्जवल निकम (Ujjwal Nikam) यांनी त्याला विरोध करत युक्तीवाद केला होता. वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पडद्यामागचा सूत्रधार होता, तोच मास्टर माईंड होता हे निकम यांनी न्यायालयात सांगितले होते. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी झाली. यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर वाल्मिक कराडच्या संपत्ती अर्जावरील निर्णय राखून ठेवला.

विशेष म्हणजे वाल्मीक कराड याचा अर्ज फेटाळल्यानंतर या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे व इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे अशा प्रकारचा अर्ज केला. तर दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी, असा अर्ज केला. त्यावर विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी म्हणणे मांडत विरोध केला.

आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात विविध कलमाखाली 12 ते 13 आरोप निश्चित केले जावे, असा विनंती अर्ज दाखल करण्यात आला. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी जे दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केले आहे. आरोप पत्र दाखल केल्यानंतर दोन महिन्यात अर्ज करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने अर्ज फेटाळावे, अशी मागणी उज्जवल निकम यांनी केली आहे. आता 4 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT