Walmik Karad  Sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad : अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरातच त्यानंतर थेट..., 22 दिवसांपासून कुठे होता गायब? धक्कादायक माहिती आली समोर

Walmik Karad Latest News Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक आरोप झालेला आणि पवनचक्की खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला फरार आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी (ता.31) पुण्यात सीआयडी आणि पोलिसांना शरण आला. त्यानंतर रात्री त्याला केज येथे आणण्यात आलं.

Jagdish Patil

Beed News, 01 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात सर्वाधिक आरोप झालेला आणि पवनचक्की खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला फरार आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी (ता.31) पुण्यात सीआयडी आणि पोलिसांना शरण आला. त्यानंतर रात्री त्याला केज येथे आणण्यात आलं.

रात्री उशिरा केजमधील न्यायालयासमोर त्याला हजर केल्यानंतर असता न्याय‍धीशांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर रात्री उशीरा वाल्मिक कराडला बीडकडे (Beed) रवाना करण्यात आलं. दरम्यान सीआयडी चौकशी दरम्यान तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपूरमध्येच (Nagpur) होता. मात्र, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कराडला आरोपी करण्याची मागणी होताच तो फरार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवाय सुरवातीचे काही दिवस तो पुण्यात राहिला आणि त्यानंतर जवळपास एका आठवड्यानंतर तो राज्याच्या बाहेर गेल्याचं सांगितलं जात आहे. तर महाराष्ट्रातून बाहेर गेल्यावर तो सुरुवातीला गोवा ,कर्नाटक आणि इतर राज्यात गेला. सीआयडीच्या (CID) सूत्रांच्या माहितीनुसार कराडबाबत ज्या महिलेची सीआयडीने चौकशी केली त्या महिलेसोबत तो सुरवाचीचे काही दिवस असल्याचीही चर्चा आहे.

मात्र, वाल्मिक कराड शरण आला त्यावेळी तो नेमका कोणत्या राज्यात होता याची माहिती मिळाली नसली तरी त्याला गाडीने महाराष्ट्रात येण्यासाठी 2 दिवस लागल्याची माहिती आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीने केज न्यायालयात हजर केलं होतं.

अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केल्यानंतर, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खंडणी प्रकरणावर अखेर न्यायाधिशांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी सुनावली आहे.

अशातच सीआयडीच्या ताब्यात असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चारही आरोपी गेवराई पोलीस कोठडीत हलवण्यात आलं आहे. वाल्मिक कराडला बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये आणण्याआधीच या चार आरोपींनी शहर पोलिस स्टेशन मधून गेवराई पोलिस कोठडीत नेण्यात आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT