Uddhav Thackeay-Mla Santosh Bangar
Uddhav Thackeay-Mla Santosh Bangar Sarkarnama
मराठवाडा

Hingoli : बांगरांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचा हिंगोलीतील नवा `सरदार` कोण?

राजेश दारव्‍हेकर

हिंगोली : बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी विश्वादर्शक ठरावाच्या दिवशी अचानक शिंदे गटात सहभागी होऊन सर्वानांच धक्का दिला. शिंदे-फडणीवस सरकारच्या बाजूने मतदान करत बांगर यांनी अखेर बंडाचा झेंडा हाती घेतलाच. (Hingoli) हिंगोलीचे जिल्हाप्रमुख राहिलेले बांगर आक्रमक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या भिडस्त स्वभावामुळेच जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने त्यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले. पण अडीच वर्षातच त्यांनी बंडखोरांचे नेतृत्व स्वीकारले.

शिवसेनेसाठी हो मोठा धक्का होता, त्याहीपेक्षा तो हिंगोलीवासीयांसाठी होता ज्यांनी दोनच दिवसांपुर्वी बांगर (Santosh Bangar) यांचा कट्टर, एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून सत्का केला होता. आता बागंर यांच्या बंडखोरीनंतर त्यांना तोडीतोड असे नेतृत्व (Shivsena) शिवसेनेला शोधावे लागणार आहे. जिल्ह्यातील राजकारणाला बांगर यांच्या बंडाने कलाटणी मिळाली असली तरी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवणारा मोठा शिवसेनेचा वर्ग आहे. त्या जोरावर आता नवा सरदार म्हणजे जिल्हाप्रमुख नेमूण शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचे आवाहन नेत्यांसमोर असणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, एक आमदार, औंढा व सेनगाव येथील नगरपंचायत तर जिल्हा परिषदेत देखील शिवसेनेचे अध्यक्ष होते. वसमत व कळमनुरी नगरपालिका शिवसेनाकडे होती.

दरम्यान बांगर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हात धरला असल्याने सेनेत दोन गट पडले आहेत. जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदार संघ युतीच्या काळात सेनेकडे तर वसमत व हिंगोली विधानसभा भाजपाकडे होती. कळमनुरीत संतोष बांगर यांनी विजय मिळवून हा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आणला. तसेच त्यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख पद देखील होते.

बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याने कळमनुरी विधानसभेत आता उध्दव ठाकरे यांच्याकडून कोणाला उमेदवारी मिळणार तसेच जिल्हाप्रमुख पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी कळमनुरी विधानसभेत अमूक एका नावाची चर्चा नाहीये. मंगळवारी हिंगोलीत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. तसेच लवकरच जिल्हाप्रमुखांची निवड केली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बांगर यांच्यानंतर आता जिल्ह्यातील शिवसेनेची कमान कोणाच्या हातात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT