सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. सगळ्याच पक्षाचे उमेदवारांनी जोरात प्रचारला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादेसाठी नवी यादी जाहीर केली आहे.
निवडणूक खर्चाचे नवे दर जाहीर होताच उमेदवारांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. निवडणुकीदरम्यान प्रचार कसा आणि किती खर्चात करायचा याचे नियोजन करणे अनिवार्य आहे. आयोगाने सांगितलेल्या नियमावलीनुसार प्रचाराची मर्यादा राखणे गरजेचे असते. उमेदवार त्यांच्या प्रचारात कोणते साहित्य वापरतात, यावर निवडणूक यंत्रणेकडून लक्ष ठेवले जाते. त्याची तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त केले जातात तसेच त्याचे चित्रीकरण केले जाते.
आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार विविध भागात प्रभागांचा आकार आणि प्रचाराची व्यप्ती लक्षात घेऊन खर्चाच्या मर्यादेत फरक ठरवण्यात येतो आणि वर्गीकरण करण्यात येते. 'अ' वर्गातील महापालिकांमध्ये उमेदवारांची कमाल मर्यादा 15 लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. लोकसंख्या, मोठे प्रभाग आणि प्रचारात वापरण्यात येणाऱ्या सामानाची संख्याही भरपूर असते हे लक्षात घेऊन मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये जाहिरात, सभा, वाहन खर्च, प्रचार साहित्य याचा समावेश आहे.
‘ब’ वर्गातील महानगरपालिकांमध्ये ही मर्यादा 'अ' वर्गापेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाणे या शहरांतील उमेदवारांना जास्तीत जास्त 13 लाख रुपये खर्च करता येणार आहेत. ही शहरे वेगाने वाढणारी असून प्रचाराची गरज मोठी असली तरी तुलनेने मर्यादा कमी ठेवण्यात आली आहे.
तर ‘क’ वर्गातील महानगरपालिकांसाठी खर्च मर्यादा 11 लाख रुपये निश्चित करण्यात आली असून यामध्ये कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि वसई-विरार या शहरांचा यात समावेश आहे. आणि उर्वरित 19 महानगरपालिकांचा समावेश ‘ड’ वर्गात करण्यात आला आहे. यामध्ये उमेदवारांसाठी खर्च मर्यादा 9 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
तुलनेने लहान शहरांमध्ये प्रचाराची व्याप्ती कमी असल्याने ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आयोगाने दिलेल्या नियमावलीच्या बाहेर जाऊन कोणताही उमेदवारने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. या नियमावलीता मुख्य उद्देश म्हणजे प्रचार करताना खर्चावर नियंत्रण ठेवणे असा आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी 2026ला होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले असून, पारदर्शक आणि नियमबद्ध निवडणुकीवर भर दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.