Pandharpur News
Pandharpur News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; १० जणांना वाहनाने चिरडले

भारत नागणे

Pandharpur news : कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर (Kolhapur) हून पंढरपूरकडे (Pandharpur) पायी निघालेल्या दहा वारकऱ्यांना एका वाहनाने चिरडले आहे. हा अपघात आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ घडला.

मृतांमध्ये यामध्ये पाच महिला एक पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील 35 वारकर्यांची पायी दिंडी पंढरपूर कडे निघाली होती. जुनोनी गावा जवळ एक चारचाकी गाडी दिंडीत घुसून मोठा अपघात झाला.

यांमध्ये शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार, सर्जेराव श्रीपती जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने कार्तिकी यात्रेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखळ केल्यानंतर ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांची संख्या १० झाली आहे. अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT