Ajit Pawar, Sanjay Raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवारांचा संजय राऊतांना टोला; शिरूरमधून डाॅ. कोल्हेच राष्ट्रवादीचे उमेदवार...

संजय राऊतांनी Sanjay Raut कार्यकर्त्यांना Supporters बरे वाटावे म्हणून वक्तव्य केले असेल, असे अजित पवार Ajit Pawar यांनी स्पष्ट केले.

Umesh Bambare-Patil

सातारा : शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी काळात शिवसेनेचे शिवाजी आढळराव की राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हा वाद सुरू असतानाच संजय राऊतांनी कोणत्या परिस्थितीत आढळराव संसदेत जाणार असे वक्तव्य करून खळबळ माजवली होती. यावर कोल्हेंनी संसदेत कोण जाणार हे जनता ठरवेल, असे स्पष्ट केले होते. याबाबत साताऱ्यात अजित पवारांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही जागा राष्ट्रवादीची असल्याने अमोल कोल्हे हेच उमेदवार असतील, कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून संजय राऊत बोलले असतील, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

अजित पवार पुढे म्हणाले, लोकसभेची अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार वाटचाल करत आहे. संजय राऊतांनी कायकर्त्यांना बरे वाटावे म्हणून वक्तव्य केले असेल. मी पण शिवसेनेचा खासदार आहे त्या जागेवर माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून मी उमेदवाराचे नाव जाहीर केले.

पण, मला तिकिट देण्याचा अधिकार आहे की शरद पवार साहेबांना आहे. संजय राऊतांना तिकिट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरेंना. सोनिया गांधी अधिकार की राज्यात काम करणाऱ्याना हे सगळ्यांना माहिती आहे. उद्या या वरिष्ठांनी एकत्र बसून काही निर्णय घेतले आणि जागा सिटींग पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सोडली तर मी प्रयत्न केला पण वरिष्टांपुढे काहीही चालले नाही, असे सांगितले जाते.

या गोष्टीला महत्व देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पध्दतीने ते कार्यकर्त्यांना भावनिक बनवून एक बुस्ट म्हणून काम करू शकतात. आज ते मुद्दे आम्हाला महत्वाचे वाटत नाहीत, महागाई व इतर प्रश्न महत्वाचे वाटतात. मीडियावर सातत्याने राजकिय लोकांकडून आगपाखड केली जात आहे, यावर ते म्हणाले, मधल्या काळात सभा जाहीर केल्यानंतर आता गाडीत बसलो आता पुण्यात पोहोचलो पुण्यात आहे, औरंगाबाद मध्ये आलेत...असे छापतात.

हा तुमचा अधिकार आहे, आम्ही नाकारू शकत नाही. कुठल्या पध्दतीने दाखवाचे आहे. पण आपलीही काही सगळ्यांची जबाबदारी असतो, जेणे करून समाजात शांतता राहावी, कायदा सुरक्षा राहावी. जाती जातीत तणाव होऊ नये. धर्मात तेढ निर्माण होऊ नये, या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तुमचे सकारात्मक लेख आले पाहिजेत. आर. आर. पाटलांनी संत गाडगेबाबा अभियान चालविले होते, असा दाखला त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT