Karad Shivsena
Karad Shivsena sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचीच खरी शिवसेना : संजय राऊत

Umesh Bambare-Patil

Karad News : शिवसेना संपलीय म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात येवून वातावरण पहावे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय जनतेला मान्य नाही. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray व उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांचीच खरी शिवेसना Shivsena आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले खासदार राऊत यांनी आज सायंकाळी येथील माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. माजी नगरसेवक गुजर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक आप्पा उर्फ राजेंद्र माने व सहकारी उपस्थीत होते.

यावेळी खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात चार दिवस फिरत आहे. शिवसेना संपली असे कुणी म्हणत असेल तर त्यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने निर्माण झालेले वातावरण पाहावे. निकालासह सगळं झूट आहे. ते ठरवणार का शिवसेना कोणाची, शिवसेना जनतेची असून जनतेतून निर्माण झालेला हा अग्निप्रलय आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी आग पेटवली आहे. ती अद्याप विझलेली नाही. निवडणूक आयोग आणि त्यांनी दिलेला निर्णय महाराष्ट्राची जनता अजिबात मानायला तयार नाही, मानणारही नाही. शिवसेनाही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेसह महाराष्ट्राच्या जनतेची आहे. पाच, पंचवीस खोकेवाल्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना व धनुष्यबाण विकत घेऊ शकले.

पण, जनतेचे प्रेम व हिम्मत कशी विकत घेणार. ती पाहण्यासाठी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात शिवसेनेचे नेते फिरत आहेत. शिवगर्जना यात्रा असे या यात्रेचे नाव आहे. ही गर्जना आमची नसून जनतेची आहे. जनतेतून ही चीड निर्माण झाली आहे.

शिवराळ भाषेबाबत ते म्हणाले, मी संपादक आहे. गेली 45 वर्षे विविध विषयांवर लिखाण करतो. वीस वर्षांपेक्षा जास्त काळ संसदेत आहे. मला कोणते शब्द कोठे वापरायचे हे माहिती आहे. 40 चोर ज्या पद्धतीने शिवसेनेशी बेइमानी करून पळून गेले. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्यबान विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांच्या विषयी म्हटलो आहे.

त्यांनी विधिमंडळ पक्ष फोडला. त्यामुळे विधी मंडळ पक्षासह विधिमंडळाची प्रतिष्ठा खालावली. निवडणूक आयोगाने खालच्या पातळीवर निर्णय दिलेले चालतात. मग मी बोललेलं चालत नाही का, आम्ही जे बोललो त्याचे मराठी डिक्शनरीतून समजून घ्या. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून रोज शंभर लोकांवर हल्ले होत आहे, मात्र संदीप देशपांडे कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थीत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT