Chandrakant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil: विरोधकांचा नेमका प्रॉब्लेम काय? बदलापूर प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांनी सुनावलं

Rahul Gadkar

Kolhapur News: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेवर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना सुनावले आहे.

अशा प्रकारची घटना ही कोणाच्याही मनाला क्लेश देणारी आहे. आपटे, कोतवाले कोण आहेत मला माहिती नाही. ते गायब होते हे मला तुमच्याकडूनच कळलं. अक्षय शिंदे प्रकरणावर सीआयडी इन्क्वायरी सुरू झाली आहे. हाच प्रॉब्लेम विरोधकांचा झाला आहे. आमच्यावर संविधान बदलण्याचा आरोप करणारे ते न्यायालयीन यंत्रणा मानत नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अडीच तासांचा वेळ आज दिला आहे. पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक होईल. पश्चिम महाराष्ट्र जो काँग्रेस आणि नंतर शरद पवार यांचा गड मानला जात होता, त्या ठिकाणी लोकसभेला दहापैकी चार जागा आमच्या आल्या आहेत. महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात दोन लाख मतं जास्त आहेत. पश्चिम महाराष्ट्रात यावेळेस भाजप आणि मित्र पक्षांच्या जागा निश्चित वाढतील. कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी सहा ते सात पर्यंत आमची मजल जाईल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार प्रकाश आवाडे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सांगताना अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश असल्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यासंदर्भातली कार्यवाही करत आहेत. याबाबत मला कल्पना नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

महायुतीमधील इतर पक्षासंदर्भात बोलताना, एखाद्या छोट्या पक्षाने देखील 288 जागांची तयारी करायची असते. राजकारणात कधी काही भांडण होईल आणि वेगळं लढावं लागेल हे सांगता येत नाही. २०१४ ला वेगळं लढायची भूमिका घेतली नसती तर 288 पैकी 88 जागांवर आम्हाला उमेदवारच मिळाले नसते. आम्ही या सर्व जागांची तयारी करीत असतो, म्हणजे आम्हाला युती नको असते असं नाही. छोट्या पक्षाने आपली ताकद वाढवण्यासाठी दोन-चार मतदारसंघांवर दावा केला तर चुकीचं काय? असे चंद्रकांतदादांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळ किंवा सुधीर मुनगंटीवार या नावाला हा भूखंड दिला जात नाही. त्यांचे नाव देवस्थानशी जोडलं जातं म्हणून तुम्ही म्हणता बावनकुळे ना भूखंड दिला असे म्हणतात, कुऱ्हाडी देवीसाठी हा भूखंड दिला गेला आहे. असा भूखंड महसूलच्या नियमाप्रमाणे दिला जातो. एक काळ स्वतःच्या साखर कारखाने शिक्षण संस्थांना किती प्लॉट दिले गेलेत, असा टोला विरोधकांना लगावत माझ्या महसूलमंत्री पदाच्या काळात असा एकही भूखंड दिला गेला नाही. जो भूखंड दिला गेला तो चांगल्या कामासाठी दिला गेला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT