Raj Thackrey
Raj Thackrey Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raj Thackeray : याच दगडामुळे माझ्या पायाला ठेचा लागल्या; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray News : ''मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आजार कसा गेला? मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरे व्यथित झालेत, पण ते मुख्यमंत्री असताना कोणालाही भेटत नव्हते'', अशी टीका करत ''याच दगडामुळे माझ्या पायाला ठेचा लागल्या'' असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला. ते आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, ''कोकणाचा दौरा संपला की त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा (Maharashtra) दौरा करणार आहे. येणाऱ्या निवडणुका लढवण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत. त्याबाबत सध्या दौरा सुरू आहे. तसेच मुंबई (Mumbai) महापालिकेत मनसे स्वंतत्र लढणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. दुसऱ्यांना काहीही आरोप करूद्या, पण मी माझ्या पक्षाचं काम करतो. दुसऱ्यांसाठी नाही, असं ते म्हणाले.

'' आपण हे लक्षात घ्यायला हवं. माझ्या पक्षात ९६ ते ९८ टक्के लोकं नवीन आहेत. कारण बाकीच्या पक्षाचा इतिहास आपण पाहिला तर लक्षात येईल. राष्ट्रवादी पक्षाचा इतिहास आपण लक्षात घ्या. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सुरू केला तेव्हा काँग्रेसचा संपूर्ण गट आला होता. तसं माझ्या पक्षाच्या वेळेस झालं नाही. माझ्या बरोबर सगळे लोकं नवीन आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा विस्तार होण्यासाठी वेळ लागतो. मनसेला (MNS) आता १६ वर्ष झालेत'', असं राज ठाकरे म्हणाले.

''कोल्हापूर असो नाहीतर कोणताही जिल्हा, पण बालेकिल्ले हलत असतात, आणि यापुढेही हलतील. कुठलाही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. त्यामुळे या गोष्टीसाठी वेळ लागतो'', असं म्हणत त्यांनी हर हर महादेव चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) आक्षेपाबद्दल देखील सांगितलं. ''चित्रपट न पाहता आक्षेप कसा घेता? आक्षेप घेत असाल तर चित्रपटाच्या लेखकाला, दिग्दर्शकाला विचारा त्यानंतर भूमिका घ्या, पण सध्या फक्त राजकारण केलं जातं हे वास्तव'', असल्याचं ते म्हणाले.

''सध्या सीमावादाचा प्रश्न काढला जात आहे, पण याकडे पाहून असं लक्षात येतं की मुद्याच्या प्रश्नावरून भरकटवण्यासाठी सीमावादाचा प्रश्न काढला आहे, असं दिसून येतं. तसं नसतं तर सीमावादाचा प्रश्न असाच कसंकाय मध्येच निर्माण झाला? मात्र या प्रश्नाकडे पत्रकारांनी लक्ष देण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाव न घेता याच दगडामुळे माझ्या पायाला ठेचा लागल्या'', असं त्यांनी बोलूनही दाखवलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT