Raghunath Patil On Trump trade policy sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

America Trump Tariffs : रघुनाथदादांचा ट्रम्पच्या 'टेरिफ'वर जगावेगळा सल्ला; म्हणाले, 'भारतासाठी सुवर्णसंधी'!

Raghunath Patil On Trump Tariffs : अमेरिकेने भारतावर 26% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय व्यापारावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Aslam Shanedivan

Sangli News : अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ धोरणे जाहीर करताना 60 पेक्षा अधिक देशांवर परस्पर कर लादला आहे. या टॅरिफ (Tariff) धोरणांमुळे जगाच्या पाठीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. याचा थेट जगावर परिनाम होताना दिसत आहे. तर अमेरिकेत देखील तणाव वाढल्याचे समोर येत आहे. टॅरिफ धोरणांमुळे ट्रम्प यांच्यासह टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्याविरोधात अमेरिकेतील विविध ठिकाणी निदर्शनं केली जातायेत. अशावेळी नवीन टॅरिफ धोरण जागतिक व्यापारावर परिणाम करणारे असनाचा मात्र ही संधी भारतासाठी सुवर्ण संधी असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली आहे. यामुळे सांगलीसह याची राज्यभर चर्चा आता सुरू झाली आहे.

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या सल्ल्यानुसार नवीन टॅरिफ धोरण जाहीर केले. यामुळे सध्या व्हाईट हाऊसमध्येच दोन गट पडले असून व्यापार सल्लागार पीटर नॅवारो यांनी यावरून तीव्र विरोध केला आहे. पण ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांनी फक्त भारतासाठीच हा निर्णय घेतला नसून पाकिस्तान 29%, बांगलादेश 37%, चीन 34%, म्यानमार आणि श्रीलंकेवर 44% टक्के टॅरिफ लावला आहे. याचे सध्या तीव्र पडसाद जागतिक व्यापारात दिसत आहेत. तर या धोरणाता चीननेही जशास तसे उत्तर म्हणून अमेरिकेवरही 34 टक्के टॅरिफ लादलाय. यामुळे व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. तर याचा थेट फायदा भारताला होण्याची शक्यता या दरम्याम अनेकांनी व्यक्त केलीय.

सांगली येथे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी देखील अशीच शक्यता व्यक्त केली आहे. रघुनाथदादा यांनी अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणाचे स्वागत केले आहे. तर अमेरिकेचे टेरिफ भारतासाठी सुवर्ण संधी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेनं भारतावर 26 टक्के टॅरिफ लावले आहे. हे अनेकांना संकट वाटतं आहे. पण हे भारतावर आलेलं संकट नसून ती भारतासाठी एक चांगली संधी असल्याचेही रघुनाथदादा यांनी म्हटंल आहे.

जगभरात सध्या टेरिफवरून जो वाद सुरू आहे, त्यावरून मात्र भारताने घाबरून जाण्याचे कारण नाही. भारतामध्ये कमी खर्चात उत्पादन होऊ शकतं. त्यामुळे याचा फायदा भारताने चीनच्या आधी घेतला पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

तसेच सध्या अमेरिकेच्या 27% टेरिफमुळे भारतातल्या गरीब शेतकऱ्याचा नुकसान होणार असल्याचं दावा करण्यात येतोय. पण हा दावा धादांत खोटा असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालावरील निर्यात बंदी हटवावी, अशीही मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT