Mahayuti Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BJP : पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षाने राज्य सरकारकडे केली मोठी मागणी

Rahul Gadkar

Kolhapur News, 08 August : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी 2021 साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आलेल्या 'जीआर'वर बोट ठेवत, महायुती सरकारकडे पूरग्रस्त शेतकर्‍यांना आणि पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी केली आहे.

तसंच 2021 साली महाविकास आघाडी सरकारने जे केले ते न करता 2019 पेक्षाही जास्तीची मदत द्यावी, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना अतिवृष्टी व महापुराचा फटका बसला आहे.

पंधरा दिवस पाणी फुगवटा होता. यामुळे शेत पिकांचे नुकसान झाले असून पिके कुजली आहेत. अनेक घरांना तडे गेले आहेत, घरांची पडझड झाली आहे. 2021 च्यां महापुरात महाविकास आघाडीने (MVA) शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली.

प्रति गुंठा 135 रुपये मदत शेतकऱ्यांना दिली. 2019 च्या महापुरात युती सरकारने प्रतिगुंठा जवळपास 950 रुपये मदत दिली. त्यामुळे 2019 प्रमाणे तत्काळ पंचनामे करून सरसकट पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, असंही निंबाळकर म्हणाले.

अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांचे (Farmer) मोठी नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत. त्यामुळे सरकारने पूर बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.

तसेच पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे सरसकट भरपाई द्यावी. महायुती सरकार हे पूरग्रस्तांना न्याय देत आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. पूरबाधितांना सरकारकडून लवकर मदत व्हावी. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT